नवी दिल्ली: 'अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी कायदा) कोणत्याही परिस्थितीत कमकुवत होऊ देणार नाही. उलट हा कायदा आणखी कडक केला जाईल,' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं. अॅट्रॉसिटी कायद्यावरून काँग्रेस दलितांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
२६, अलिपूर रोडवरील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करताना नरेंद्र मोदींनी हे आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसच्या काळात बाबासाहेबांचा जेवढा अपमान झाला, तेवढा कधीच झाला नव्हता, असा घणाघाती हल्ला मोदींनी काँग्रेसवर चढवला. 'अॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारने तात्काळ न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. परंतु त्या दरम्यान ६ दिवस सुट्ट्या होत्या. त्यामुळे त्यावर सुनावणी होऊ शकली नाही,' असं सांगतानाच 'दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी २०१५ मध्ये आमच्या सरकारने हा कायदा आणखी कडक केला. आमच्याच सरकारने या कायद्याच्या कक्षेत आणखी ४७ गुन्हे आणले. पीडितांना नुकसान भरपाई म्हणून मिळणाऱ्या रकमेत वाढ केली,' असं त्यांनी स्पष्ट केलं. जो कायदा आम्ही कडक केला आहे. तो कधीच कमकुवत होऊ देणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
दलितांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. अॅट्रॉसिटी कायद्यावरील सुनावणीसाठी विशेष कोर्टाची स्थापना केली जाणार आहे. सरकारने आयोग नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींमधील अतिमागासांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सब कॅटेगिरी निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने आयोगाची निर्मिती केली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आरक्षण बंद होणार नाही
यावेळी मोदी यांनी आरक्षण बंद केलं जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं. 'निवडणुका आल्यावर आरक्षण रद्द केली जाण्याची अफवा पसरवून काँग्रेस दलितांना भडकावण्याचं काम करत असते,' अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी नेहरू मंत्रीमंडळाचा उल्लेखही केला. 'बाबासाहेबांना नेहरू सरकारने कोणत्याही महत्त्वाच्या समितीत घेतले नाही. नेहरू सरकारशी मतभेद झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. एवढंच कशाला काँग्रेसने काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भारतरत्न पुरस्कार दिला, पण बाबासाहेबांना त्यांनी भारतरत्न दिला नाही,' असं सांगतानाच बाबासाहेबांसाठी केलंलं एखादं काम सांगण्याचं आव्हानही त्यांनी काँग्रेसला दिलं. काँग्रेसला पडत्या काळात बाबासाहेबांची आठवण झाली आहे. केवळ व्होट बँक म्हणून काँग्रेस बाबासाहेबांकडे पाहत आहे, असा टोला त्यांनी हाणला.
न्यू इंडिया हा बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत
मी ज्या न्यू इंडियाबद्दल बोलत असतो, ते दुसरं-तिसरं काही नसून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आहे, असं सांगतानाच केंद्रात सत्तेत आल्यानंतर दलितांसाठी आरक्षित असलेली पदे भरण्याचा सपाटा लावल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.
२६, अलिपूर रोडवरील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन करताना नरेंद्र मोदींनी हे आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसच्या काळात बाबासाहेबांचा जेवढा अपमान झाला, तेवढा कधीच झाला नव्हता, असा घणाघाती हल्ला मोदींनी काँग्रेसवर चढवला. 'अॅट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारने तात्काळ न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. परंतु त्या दरम्यान ६ दिवस सुट्ट्या होत्या. त्यामुळे त्यावर सुनावणी होऊ शकली नाही,' असं सांगतानाच 'दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी २०१५ मध्ये आमच्या सरकारने हा कायदा आणखी कडक केला. आमच्याच सरकारने या कायद्याच्या कक्षेत आणखी ४७ गुन्हे आणले. पीडितांना नुकसान भरपाई म्हणून मिळणाऱ्या रकमेत वाढ केली,' असं त्यांनी स्पष्ट केलं. जो कायदा आम्ही कडक केला आहे. तो कधीच कमकुवत होऊ देणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
दलितांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. अॅट्रॉसिटी कायद्यावरील सुनावणीसाठी विशेष कोर्टाची स्थापना केली जाणार आहे. सरकारने आयोग नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींमधील अतिमागासांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सब कॅटेगिरी निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने आयोगाची निर्मिती केली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आरक्षण बंद होणार नाही
यावेळी मोदी यांनी आरक्षण बंद केलं जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं. 'निवडणुका आल्यावर आरक्षण रद्द केली जाण्याची अफवा पसरवून काँग्रेस दलितांना भडकावण्याचं काम करत असते,' अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी नेहरू मंत्रीमंडळाचा उल्लेखही केला. 'बाबासाहेबांना नेहरू सरकारने कोणत्याही महत्त्वाच्या समितीत घेतले नाही. नेहरू सरकारशी मतभेद झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. एवढंच कशाला काँग्रेसने काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भारतरत्न पुरस्कार दिला, पण बाबासाहेबांना त्यांनी भारतरत्न दिला नाही,' असं सांगतानाच बाबासाहेबांसाठी केलंलं एखादं काम सांगण्याचं आव्हानही त्यांनी काँग्रेसला दिलं. काँग्रेसला पडत्या काळात बाबासाहेबांची आठवण झाली आहे. केवळ व्होट बँक म्हणून काँग्रेस बाबासाहेबांकडे पाहत आहे, असा टोला त्यांनी हाणला.
न्यू इंडिया हा बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत
मी ज्या न्यू इंडियाबद्दल बोलत असतो, ते दुसरं-तिसरं काही नसून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आहे, असं सांगतानाच केंद्रात सत्तेत आल्यानंतर दलितांसाठी आरक्षित असलेली पदे भरण्याचा सपाटा लावल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.