अमेठी :
'आम्ही बॅकफूटवर नाही तर फ्रंटफूटवर खेळणार आहोत आणि त्यासाठीच आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे', असे नमूद करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीमागचं कारण स्पष्ट केलं. राहुल गांधी अमेठीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. अमेठीला पोहोचण्याआधी त्यांनी हा मोठा डाव खेळला आहे. त्यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल बोलत होते. पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी सपा-बसपासोबत चर्चेची दारं खुली ठेवणार असल्याचंही सांगितलं. मायावती आणि अखिलेशसोबत माझं कोणतंही शत्रुत्व नाही, हेही स्पष्ट केलं. राहुल गांधी म्हणाले, 'पूर्णपणे सक्षम असलेली माझी बहीण प्रियांका आता माझ्यासोबत काम करणार याचा मला वैयक्तिक खूप आनंद आहे. हा मोठा निर्णय घेण्यामागे आमचं इतकंच उद्दिष्ट आहे की आम्ही बॅकफूट नाही तर फ्रंटफूटवर खेळणार आणि काँग्रेसची विचारधारा कायम राखण्याचा पूर्ण प्रयत्न करणार.'
प्रियांका निवडणूक लढणार का या प्रश्नावर राहुल म्हणाले, 'हे तिच्यावर आहे. पण मी प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांना दोन महिन्यांसाठी उत्तर प्रदेशात पाठवलेले नाही तर काँग्रेसची जी विचारधारा आहे तिला यूपीत पुन्हा बळकट करण्याचे काम करण्यास सांगितले आहे. ती दोघंही यूपीत काँग्रेसला बळकट करतील अशी मला आशा आहे.'
'मायावती आणि अखिलेश यांनी आम्हाला आघाडीत समाविष्ट केले नाही. हा त्यांचा निर्णय होता. पण आमच्या मनात त्यांच्यासाठी प्रेम आहे, तिरस्कार नाही. आम्ही तिघंही भाजपला हरवण्यासाठी लढत आहोत. तिघांच्या विचारधारेत खूप समानता आहे. त्यांना जेव्हा गरज पडेल, तेव्हा आम्ही त्यांना सहकार्य करू,' अशी भूमिका राहुल यांनी मांडली.
'यूपीच्या जनतेने, युवकांनी आणि शेतकऱ्यांनी भाजपला सत्तेवर आणून खूप वेळ वाया घालवला. भाजपने यूपीला उद्ध्वस्त केले. त्यांना हटवा, आम्हाला निवडून द्या. आम्ही तुम्हाला नवी दिशा देऊ. आम्ही कोणत्या जाती-धर्माच्या गोष्टी करणार नाही. यूपीच्या युवकांना जे हवे ते काँग्रेस देऊ शकते,' असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
'आम्ही बॅकफूटवर नाही तर फ्रंटफूटवर खेळणार आहोत आणि त्यासाठीच आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे', असे नमूद करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीमागचं कारण स्पष्ट केलं. राहुल गांधी अमेठीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. अमेठीला पोहोचण्याआधी त्यांनी हा मोठा डाव खेळला आहे. त्यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल बोलत होते.
प्रियांका निवडणूक लढणार का या प्रश्नावर राहुल म्हणाले, 'हे तिच्यावर आहे. पण मी प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांना दोन महिन्यांसाठी उत्तर प्रदेशात पाठवलेले नाही तर काँग्रेसची जी विचारधारा आहे तिला यूपीत पुन्हा बळकट करण्याचे काम करण्यास सांगितले आहे. ती दोघंही यूपीत काँग्रेसला बळकट करतील अशी मला आशा आहे.'
'मायावती आणि अखिलेश यांनी आम्हाला आघाडीत समाविष्ट केले नाही. हा त्यांचा निर्णय होता. पण आमच्या मनात त्यांच्यासाठी प्रेम आहे, तिरस्कार नाही. आम्ही तिघंही भाजपला हरवण्यासाठी लढत आहोत. तिघांच्या विचारधारेत खूप समानता आहे. त्यांना जेव्हा गरज पडेल, तेव्हा आम्ही त्यांना सहकार्य करू,' अशी भूमिका राहुल यांनी मांडली.
'यूपीच्या जनतेने, युवकांनी आणि शेतकऱ्यांनी भाजपला सत्तेवर आणून खूप वेळ वाया घालवला. भाजपने यूपीला उद्ध्वस्त केले. त्यांना हटवा, आम्हाला निवडून द्या. आम्ही तुम्हाला नवी दिशा देऊ. आम्ही कोणत्या जाती-धर्माच्या गोष्टी करणार नाही. यूपीच्या युवकांना जे हवे ते काँग्रेस देऊ शकते,' असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.