मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि ठिकाण ठरवण्याचे अधिकार आमच्याकडे असल्याचे सांगत उरी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे संकेत लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिले. उरी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून दहशतवाद्यांना आणि सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. आता लष्करानेदेखील या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
We reserve the right to respond to any act of the adversary at the time and place of our own choosing: DGMO Lt Gen Ranbir Singh — ANI (@ANI_news) September 19, 2016
उरी हल्ल्यानंतर लष्कर छावणी परिसरातील शोधमोहीम पूर्ण झाल्याची माहिती लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली. या शोधमोहिमेदरम्यान, चार एके रायफल्स, चार ग्रेनेड लाँचर, दोन रेडिओ सेट, पाच हॅण्ड ग्रेनेड आदी हत्यारांसह दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर खाद्याने आणि औषधे सापडली असल्याची माहिती सिंग यांनी दिली. या हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहचत असून त्याचे पुरावे असल्याचे सिंग यांनी म्हटले. उरीसारख्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता लष्कराकडे असून वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवणार आहोत आणि त्याचा अधिकार आम्हाला असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.
हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि ठिकाण ठरवण्याचे अधिकार आमच्याकडे असल्याचे सांगत उरी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे संकेत लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिले. उरी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून दहशतवाद्यांना आणि सूत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. आता लष्करानेदेखील या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
We reserve the right to respond to any act of the adversary at the time and place of our own choosing: DGMO Lt Gen Ranbir Singh — ANI (@ANI_news) September 19, 2016
उरी हल्ल्यानंतर लष्कर छावणी परिसरातील शोधमोहीम पूर्ण झाल्याची माहिती लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिली. या शोधमोहिमेदरम्यान, चार एके रायफल्स, चार ग्रेनेड लाँचर, दोन रेडिओ सेट, पाच हॅण्ड ग्रेनेड आदी हत्यारांसह दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर खाद्याने आणि औषधे सापडली असल्याची माहिती सिंग यांनी दिली. या हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहचत असून त्याचे पुरावे असल्याचे सिंग यांनी म्हटले. उरीसारख्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता लष्कराकडे असून वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवणार आहोत आणि त्याचा अधिकार आम्हाला असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.