अ‍ॅपशहर

दोन रसगुल्ल्यांमुळे तुटले लग्न

वधू किंवा वर लग्नाच्या दिवशी पळून गेल्याने लग्न तुटल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एक लग्न तुटले ते फक्त दोन रसगुल्ल्यांवरून झालेल्या मारामारीमुळे.

Maharashtra Times 19 Apr 2017, 3:34 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कुर्मापूर (उत्तर प्रदेश)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम wedding called due to rasgulla
दोन रसगुल्ल्यांमुळे तुटले लग्न


मुलगा किंवा मुलगी पसंत न आल्याने किंवा अगदी फिल्मी स्टाइल वधू किंवा वर लग्नाच्या दिवशी पळून गेल्याने लग्न तुटल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एक लग्न तुटले ते फक्त दोन रसगुल्ल्यांवरून झालेल्या मारामारीमुळे.

उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊपासून ७० किलोमीटवर असणाऱ्या उनाओ जिल्ह्यातील कुर्मापूर येथे मुलीच्या गावी हा प्रकार घडला. मुलीच्या गावी लग्न असल्याने एक दिवस आधीच मुलाकडील वऱ्हाडी कुर्मापूरमध्ये दाखल झाले. दिवसभर लग्नाच्या आधीचे कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम लगेच उरकून घेण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली. जेवणामध्ये प्रत्येक वऱ्हाड्याला एकच रसगुल्ला देण्याचे आदेश कॅटर्सला दिले होते. मात्र मुलाच्या चुलत भावाने स्वत:ला एक ऐवजी दोन रसगुल्ले वाढून घेतल्याने वाद झाला. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि काही क्षणांतच जेवणाच्या काऊंटरवरील भांडी अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली होती. हा सर्व प्रकार वधू बाल्कनीमधून पाहात होती. त्यावेळी मुलांच्या नातेवाईकांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केली असल्याचे
लक्षात आल्याने मुलीनेच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या वडिलांनी वऱ्हाड्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज