अ‍ॅपशहर

rahul gandhi : 'ममता म्हणतात खेला होबे... हे सर्व राजकीय नाटक आहे', राहुल गांधींचा घणाघात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा काँग्रेस खासदार राहुल गांधींची आज एन्ट्री झाली आहे. निवडणुकीत प्रथमच ते पाचव्या टप्प्यातील प्रचारात दिसून आले. राहुल गांधींनी यांनी सभेतू पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2021, 10:34 pm
कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ( west bengal election ) सुरू आहे. राज्यात आतापर्यंत ४ टप्प्यांत १३५ जागांसाठी मतदान झालं आहे. यानंतर प्रथमच राहुल गांधींची ( rahul gandhi ) आज पश्चिम बंगालमध्ये एन्ट्री झाली. राहुल गांधी यांची उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील गोलपोखरमध्ये प्रचारसभा झाली. यासभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी ( pm modi ) आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर ( mamata banerjee ) निशाणा साधला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhi
'ममता म्हणतात खेला होबे... इथं सर्व राजकीय नाटक सुरू आहे', राहुल गांधींचा घणाघात


पंतप्रधान मोदी हे थाळी वाजवून करोनाचा प्रादुर्भाव रोखत आहेत. मोदी म्हणतात, करोना आला की थाळी वाजवा, घंटी वाजवा, मोबाइलचा लाइट लावा. करोना निघून जाईल. गेला का करोना? ममता बॅनर्जी म्हणतात खेला होबे. हे काय नाटक सुरू आहे? अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

'भाजपमध्ये घृणा आणि हिंसेशिवाय काही नाही'

भाजपकडून तुम्हाला घृणा आणि हिंसेशिवाय काहीही मिळणार नाही. भाजपला पश्चिम बंगालचे विभाजन करायचे आहे. असंच ते तामिळनाडू आणि आसाममध्ये करत आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदींना काहीही होणार नाही. आग लागली तर बंगाल जळेल. बंगालमधील माता-भगिनी रडतील, असा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला.

बंगालचे विभाजन झाले तर सर्वाधिक नुकसान हे बंगालची जनता आणि भविष्याचे होईल. भाजपने उत्तर प्रदेश पेटवला. त्याच्या जोरावर ते निवडणूक जिंकले. त्यानंतर काय झालं? आज तिथे काय घडतंय? असा सवाल राहुल गांधींनी केला.

'पश्चिम बंगालमध्ये रोजगारासाठी लाचखोरी'

राहुल गांधींनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला. रोजगार मिळवण्यासाठीही नागरिकांना लाच द्यावी लागतेय. तुम्हाला नोकरी पाहिजे, काम पाहिजे मग ममतादीदींच्या माणसांना लाच द्यावी लागत आहेत. निवडणूक आल्यावर ममता म्हणतात खेला होबे. कुठला खेळ... इथे रस्ते कोण बांधणार? महाविद्यालय आणि विद्यापीठ कोण उभारणार? खेळ खेळायचा आहे तर मैदानात खेळू. इथं सर्व राजकीय नाटक सुरू आहे, असा घणाघात राहुल गांधींनी केला.

कूचबिहार गोळीबार : ममता बॅनर्जींनी घेतली मृतांच्या कुटुंबीयांची भेट

राहुल गांधी राज्यात पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीतील प्रचारासाठी आले. याआधी त्यांनी आसाम, केरळ, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला. पण ते बंगालमध्ये प्रचारासाठी आले नाही. बंगालमध्ये काँग्रेसची पकड ही उत्तर दिनाजपूर, मालदा, मुर्शिदाबाद या जिल्ह्यांवर आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात या भागांमध्ये मतदान होणार आहे.

Mamata Banerjee : गांधी पुतळ्याजवळ ममता बॅनर्जी एकट्याच बसल्या आंदोलनावर

महत्वाचे लेख