अ‍ॅपशहर

हवामान विभागाचे काय चुकले?

सरासरीपेक्षा कमी पावसाचा प्राथमिक अंदाज वर्तवणाऱ्या भारतीय हवामान विभागाने आपल्या चुकलेल्या अंदाजाचे विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा सरासरीच्या १० टक्के अधिक पाऊस झाल्याने हवामान खाते तसेच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेचा भारतातील मान्सूनबाबतचा अंदाज सपशेल चुकीचा ठरला.

Maharashtra Times 3 Oct 2019, 5:44 am
नवी दिल्ली : सरासरीपेक्षा कमी पावसाचा प्राथमिक अंदाज वर्तवणाऱ्या भारतीय हवामान विभागाने आपल्या चुकलेल्या अंदाजाचे विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा सरासरीच्या १० टक्के अधिक पाऊस झाल्याने हवामान खाते तसेच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेचा भारतातील मान्सूनबाबतचा अंदाज सपशेल चुकीचा ठरला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imd-forecast


हवामान खात्याने सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज एप्रिलमध्ये वर्तवला होता. तर 'स्कायमेट'ने हीच टक्केवारी ९३ असेल, असे नमूद केले होते. हे अंदाज अधिक-उणे ५ अंशांनी बदलू शकतात, असेही दोन्ही संस्थांनी स्पष्ट केले होते. मात्र, तरीही हे दोन्ही अंदाज चुकीचे ठरत देशात १० टक्के अधिक पाऊस झाला. जुलैमध्ये सरासरीच्या १०५ टक्के, ऑगस्टमध्ये ११५ टक्के (सन १९९६नंतर सर्वाधिक), तर सप्टेंबरमध्ये १५२ टक्के पाऊस झाला. यामुळे हवामान खात्याने आता आपल्याच अंदाजाचे विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मोहपात्रा यांनी आपल्याच विभागाचे काय चुकले याचा शोध घेण्याचे ठरवले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज