अ‍ॅपशहर

फेक मेसेज रोखणार; व्हॉट्सअॅपचे सरकारला उत्तर

बोगस, भडकावू आणि खळबळजनक मेसेजला 'वेसण' घालण्यासंबंधी पत्रव्यवहार केल्यानंतर व्हॉट्सअॅपनं सरकारला उत्तर दिलं आहे. व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळं जमावाकडून होणाऱ्या हिंसक घटना भयावह असून, सरकारप्रमाणेच आम्हीही चिंतित आहोत. अॅपचा दुरुपयोग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असं व्हॉट्सअॅपनं म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2018, 8:27 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम whatsapp


बोगस, भडकावू आणि खळबळजनक मेसेजला 'वेसण' घालण्यासंबंधी पत्रव्यवहार केल्यानंतर व्हॉट्सअॅपनं सरकारला उत्तर दिलं आहे. व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेजमुळं जमावाकडून होणाऱ्या हिंसक घटना भयावह असून, सरकारप्रमाणेच आम्हीही चिंतित आहोत. अॅपचा दुरुपयोग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, असं व्हॉट्सअॅपनं म्हटलं आहे.

देशातील अनेक भागांत जमावाकडून हत्येच्या घटना घडल्यानंतर मंगळवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं व्हॉट्सअॅपला पत्र पाठवून बोगस मेसेज रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचला, असे आदेश दिले होते. तसंच व्हॉट्सअॅप कंपनी जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, असा इशाराही दिला होता. त्यावर व्हॉट्सअॅपनं सरकारला उत्तर दिलं आहे. 'व्हॉट्सअॅपवरून पसरवण्यात येणारे अफवांचे मेसेज आणि चुकीच्या माहितीमुळं चिंतित आहोत. खरं तर अशा प्रकारचे मेसेज रोखणे आव्हानात्मक आहे. पण त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. बोगस मेसेज रोखण्यासाठी सरकार, समाज आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे,' असं व्हॉट्सअॅपनं म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज