वृत्तसंस्था, नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे राजकारणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही सक्रिय होते. त्यातही क्रिकेट आणि गॉल्फवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा शिंदे यांनी गंमतीच्या भरात रचलेल्या एका दरोड्याच्या कटामुळे तत्कालिन भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूंचा थरकाप उडाला होता. ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी 'द हाउस ऑफ सिंधियाज : ए सागा ऑफ पॉवर, पॉलिटिक्स अॅण्ड इंट्रीग' या पुस्तकात शिंदे यांच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. ग्वाल्हेर घराण्याचे वारसदार असलेल्या शिंदे यांची गंभीर राजकारणी म्हणून ओळख होती. प्रत्यक्षात त्यांना थट्टामस्करी आवडायची आणि त्याचा ते मनसोक्त आनंदही लुटायचे. एकदा शिंदे यांनी ग्वाल्हेरमध्ये एका प्रदर्शनी क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते.
या सामन्यासाठी नवाब मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, इरापल्ली प्रसन्ना यांच्यासह तत्कालिन भारतीय संघातील जवळपास सर्वच दिग्गज खेळाडू ग्वाल्हेरला आले होते. या पाहुण्यांच्या करमणुकीसाठी शिंदे यांनी त्यांना शिकारीसाठी (त्यावेळी शिकारीसाठी परवानगी होती) शिवपुरीच्या जंगलात नेले. दिवसभर फिरल्यानंतर सर्व खेळाडू जंगलातच झोपी गेले.
रात्री बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने क्रिकेटपटूंना जाग आली. डोळे उघडून पाहतात तो काही शस्त्रसज्ज दरोडेखोरांनी घेरले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 'तुम्ही सर्वजण तुमचे सामान आमच्याकडे द्या आणि बाहेर उभ्या असलेल्या जीपमध्ये जाऊन बसा,' अशी आज्ञा त्या दरोडेखोरांनी क्रिकेटपटूंना केली.
समोर दरोडेखोरांना पाहून सर्वच क्रिकेटपटू घाबरून गेले होते. विश्वनाथ आणि प्रसन्ना यांनी 'आम्ही भारतीय क्रिकेटपटू आहोत,' असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दरोडेखोरांनी काहीही ऐकून घेतले नाही. थोड्याच वेळात तिथे प्रत्यक्ष माधवराव शिंदे स्वत: आले आणि दरोड्याचे हे नाट्य संपले.
दरोडेखोर बनून आलेले लोक शिंदे यांचे कर्मचारी असल्याचे कळल्यावर क्रिकेटपटूंना हायसे वाटले. मात्र, तोपर्यंत शिंदे यांची चांगलीच करमणूक झाली होती, असे या पुस्तकात म्हटले आहे.
'दरोड्याचे हे संपूर्ण नाटक मी आणि माधवरावांनी मिळून रचले होते,' अशी कबुली पतौडी यांनी नंतर दिली होती.
ग्वाल्हेर राजघराण्याच्या इतिहासाचा मागोवा घेतानाच राजवाड्यातील राजकारण, कारस्थाने आणि तिथल्या वारसांच्या वैयक्तिक आयुष्यावरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.
या सामन्यासाठी नवाब मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ, इरापल्ली प्रसन्ना यांच्यासह तत्कालिन भारतीय संघातील जवळपास सर्वच दिग्गज खेळाडू ग्वाल्हेरला आले होते. या पाहुण्यांच्या करमणुकीसाठी शिंदे यांनी त्यांना शिकारीसाठी (त्यावेळी शिकारीसाठी परवानगी होती) शिवपुरीच्या जंगलात नेले. दिवसभर फिरल्यानंतर सर्व खेळाडू जंगलातच झोपी गेले.
रात्री बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने क्रिकेटपटूंना जाग आली. डोळे उघडून पाहतात तो काही शस्त्रसज्ज दरोडेखोरांनी घेरले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 'तुम्ही सर्वजण तुमचे सामान आमच्याकडे द्या आणि बाहेर उभ्या असलेल्या जीपमध्ये जाऊन बसा,' अशी आज्ञा त्या दरोडेखोरांनी क्रिकेटपटूंना केली.
समोर दरोडेखोरांना पाहून सर्वच क्रिकेटपटू घाबरून गेले होते. विश्वनाथ आणि प्रसन्ना यांनी 'आम्ही भारतीय क्रिकेटपटू आहोत,' असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दरोडेखोरांनी काहीही ऐकून घेतले नाही. थोड्याच वेळात तिथे प्रत्यक्ष माधवराव शिंदे स्वत: आले आणि दरोड्याचे हे नाट्य संपले.
दरोडेखोर बनून आलेले लोक शिंदे यांचे कर्मचारी असल्याचे कळल्यावर क्रिकेटपटूंना हायसे वाटले. मात्र, तोपर्यंत शिंदे यांची चांगलीच करमणूक झाली होती, असे या पुस्तकात म्हटले आहे.
'दरोड्याचे हे संपूर्ण नाटक मी आणि माधवरावांनी मिळून रचले होते,' अशी कबुली पतौडी यांनी नंतर दिली होती.
ग्वाल्हेर राजघराण्याच्या इतिहासाचा मागोवा घेतानाच राजवाड्यातील राजकारण, कारस्थाने आणि तिथल्या वारसांच्या वैयक्तिक आयुष्यावरही या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.