नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज वर्ष पूर्ण होतंय. या घटनेतील सीआरपीएफच्या ४० शहीद जवानांचं स्मरण आज सगळा देश करतोय. काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निमित्तानं पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिलीय. परंतु, सोबतच त्यांनी मोदी सरकारला काही बोचरे प्रश्नही विचारलेत. यामध्ये त्यांनी सुरक्षेतील घोडचुकीसाठी मोदी सरकारमध्ये कुणाला जबाबदार धरण्यात आलं? असा प्रश्न विचारलाय.
शहीदांच्या घरची माती घेऊन अनोखी श्रद्धांजली
राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत सोशल मीडियाद्वारे हे प्रश्न विचारलेत. ' आज जेव्हा आपण सगळे पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांचं स्मरण करत आहोत, तेव्हा आपल्याला हेदेखील विचारायला हवं...
१. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला?
२. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत काय आढळलं?
३. सुरक्षेतील ढिसाळपणाबद्दल मोदी सरकारमध्ये कुणाला जबाबदार धरण्यात आलं?'
परराष्ट्र मंत्री खोट्या बातम्या पसरवत आहेत: गुहा
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी सीपीआय (एम) नेते मोहम्मद सलीम यांनीदेखील पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी मोदी सरकारवर निशाणा साधला. 'आम्हाला जवानांचं स्मारक नकोय तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय की आंतरराष्ट्रीय सीमेवरून ८० किलो आरडीएक्स भारतात आलंच कसं? तेदेखील त्या स्थळावरून जिथं सेनेची संख्या मोठ्या प्रमाणात आहे', असा प्रश्न मोहम्मद सलीम यांनी विचारलाय.
पुलवामा शहिदांना गृह मंत्री, संरक्षण मंत्र्यांकडून श्रद्धांजली
यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रीपदावर असणाऱ्या भाजपच्या काही प्रमुख नेत्यांवर निवडणुकीच्या प्रचारासाठी सेनेचा 'वापर' करण्याचे आरोप अनेकदा करण्यात आलेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं याचा 'बदला' घेत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करत बालाकोट स्ट्राईक घडवून आणली होती. त्यानंतर लगेचच समोर आलेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात हा मुद्दा प्रकर्षानं चर्चिला गेला होता.
काँग्रेससहीत इतर पक्षांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही नोंदवली होती. यासाठी, पुरावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केलेल्या भाषणांचे नमुनेही देण्यात आले होते.
शहीदांच्या घरची माती घेऊन अनोखी श्रद्धांजली
राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत सोशल मीडियाद्वारे हे प्रश्न विचारलेत. ' आज जेव्हा आपण सगळे पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांचं स्मरण करत आहोत, तेव्हा आपल्याला हेदेखील विचारायला हवं...
१. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला?
२. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत काय आढळलं?
३. सुरक्षेतील ढिसाळपणाबद्दल मोदी सरकारमध्ये कुणाला जबाबदार धरण्यात आलं?'
परराष्ट्र मंत्री खोट्या बातम्या पसरवत आहेत: गुहा
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी सीपीआय (एम) नेते मोहम्मद सलीम यांनीदेखील पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी मोदी सरकारवर निशाणा साधला. 'आम्हाला जवानांचं स्मारक नकोय तर आम्हाला हे जाणून घ्यायचंय की आंतरराष्ट्रीय सीमेवरून ८० किलो आरडीएक्स भारतात आलंच कसं? तेदेखील त्या स्थळावरून जिथं सेनेची संख्या मोठ्या प्रमाणात आहे', असा प्रश्न मोहम्मद सलीम यांनी विचारलाय.
पुलवामा शहिदांना गृह मंत्री, संरक्षण मंत्र्यांकडून श्रद्धांजली
यापूर्वीही अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रीपदावर असणाऱ्या भाजपच्या काही प्रमुख नेत्यांवर निवडणुकीच्या प्रचारासाठी सेनेचा 'वापर' करण्याचे आरोप अनेकदा करण्यात आलेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं याचा 'बदला' घेत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करत बालाकोट स्ट्राईक घडवून आणली होती. त्यानंतर लगेचच समोर आलेल्या लोकसभा निवडणूक प्रचारात हा मुद्दा प्रकर्षानं चर्चिला गेला होता.
काँग्रेससहीत इतर पक्षांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारही नोंदवली होती. यासाठी, पुरावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत केलेल्या भाषणांचे नमुनेही देण्यात आले होते.