अ‍ॅपशहर

पाकविरोधात देश मोदींच्या पाठिशी: नितीशकुमार

भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर सुरू झालेल्या राजकीय वादात आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उडी घेतली आहे. पाकिस्तानच्या विरोधात सगळा देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. मात्र, मोदींनी पाकिस्तानला प्रेमपत्र लिहीणे बंद केले पाहिजे, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका सभेत म्हंटले. भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या मुद्यावर राजकीय संधिसाधूपणा बंद झाला पाहिजे असे मत नितीशकुमार यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 18 Oct 2016, 11:29 am
मटा ऑनलाइन वृत्त। राजगीर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम whole nation with you stop love letters to pak nitish kumar to pm mod
पाकविरोधात देश मोदींच्या पाठिशी: नितीशकुमार


भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर सुरू झालेल्या राजकीय वादात आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उडी घेतली आहे. पाकिस्तानच्या विरोधात सगळा देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. मात्र, मोदींनी पाकिस्तानला प्रेमपत्र लिहिणे बंद केले पाहिजे, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हंटले. भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या मुद्यावर राजकीय संधिसाधूपणा बंद झाला पाहिजे असे मत नितीशकुमार यांनी व्यक्त केले.

पाटणाजवळ असणाऱ्या राजगीरमधील एका सभेत नितीशकुमार बोलत होते. पाकिस्तानची जागतिक पातळीवर कोंडी करण्यासाठी केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना नितीश यांनी यावेळी दाद दिली. 'पाकिस्तानच्या विरोधात सर्व योग्य पावले उचलली पाहिजेत. जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटे पाडण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम अधिक तीव्र करणे आवश्यक आहे. मात्र, मोदींनी पाकिस्तानला प्रेमपत्र लिहीणे बंद केले पाहिजे’ असेही नितीश यांनी म्हंटले.

मागील वर्षी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या नियोजित दौऱ्यात बदल करत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. त्याचा संदर्भ देत नितीशकुमार यांनी पाकिस्तानला प्रेमपत्र लिहिणे बंद करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी 'सर्जिकल स्ट्राइक'चे यश पंतप्रधान मोदी यांना असल्याचे म्हटले होते. आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत 'सर्जिकल स्ट्राइक'ची कारवाई प्रचाराचा मुद्दा बनवणार असल्याचे सूतोवाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.

भाजप सर्जिकल स्ट्राइक कारवाईचा राजकीय फायदा उचलू पाहत असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या फायद्यासाठी जवानांच्या रक्ताची दलाली करत असल्याची बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली होती. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे जाहीर करून पाकिस्तानचे तोंड बंद करावे अशी तिरकस टिप्पणी केली होती. या दोघांच्या वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज