अ‍ॅपशहर

भारतात खरंच सेक्युलरिजम आहे का? ख्रिसमस सुट्टीवरून दीदींचा प्रश्न

Mamata Banerjee : ख्रिससमच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी का नाही? असा प्रश्न विचारतानाच ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Dec 2020, 2:39 pm
कोलकाता : आगामी वर्षात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राज्यात सुरू झालीय. थंडीच्या दिवसातही पश्चिम बंगालची राजकीय हवा तापू लागलीय. याच दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी ख्रिसमस सुट्टीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधलाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mamata Banerjee
भारतात खरंच सेक्युलरिजम आहे का? ख्रिसमस सुट्टीवरून दीदींचा प्रश्न


कोलकाता पार्क स्ट्रीट स्थित एलन पार्कमध्ये सोमवारी सायंकाळी ख्रिसमस कार्निव्हलचं उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपस्थित झाल्या होत्या. यावेळी, 'ख्रिश्चन समाजानं असं काय केलंय ज्यामुळे ख्रिस्तांच्या जन्मदिवशी राष्ट्रीय सुट्टी नसते' असा प्रश्न विचारतानाच 'भारतात धार्मिक तेढ निर्माण करण्याचं राजकारण सुरू आहे' असा आरोप करत त्यांनी भाजपला आपल्या निशाण्यावर घेतलं.

भारतात खरंच सेक्युलरिजम आहे का? असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे.


अलीगढ मुस्लीम विद्यापीठ हे जणू 'मिनी भारत' : पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीर DDC निवडणूक निकाल LIVE : 'गुपकार'नं भाजपला टाकलं मागे
२०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर २५ डिसेंबर रोजी 'गुड गव्हर्नन्स' साजरा करणार असल्याचं सांगत याआडून सुट्टी संपुष्टात आणली गेली. खरंतर ख्रिसमसवर सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जायला हवी. आपण सर्वच संविधानचा सन्मान करतो. परंतु, संविधानातील मूल्य मात्र सध्या पायदळी तुडवले जात आहेत, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.

गुरु रविंद्रनाथ टागोर यांचा अपमान आपण सहन करणार नाही, असंही यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. राष्ट्रगीत म्हणून जन गण मनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना हे माहीत करून घ्यायला हवं की हा या देशाच्या मातीचा सन्मान आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणलाय.

२८ डिसेंबर रोजी बीरभूम जिल्ह्यात एक बैठक घेणार असल्याचं तसंच २९ डिसेंबर रोजी बोलपूरमध्ये एक रोड शो आयोजित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

उल्लेखनीय म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या दोन दिवसीय बंगाल दौऱ्यात बीरभूममध्ये शक्ती प्रदर्शन केलं होतं. या दरम्यान त्यांनीही रोड शो साठी बोलपूरची निवड केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज