अ‍ॅपशहर

नवऱ्याला सोडू शकते, पण मोबाईलला नाही! वर्षभरातच संसार मोडला, बायकोनं काडीमोड घेतला

Wife Left Husband For Mobile: वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याचे वैवाहिक आयुष्य मोबाईलमुळे संपुष्टात आलं आहे. पत्नीचं सतत मोबाईलवर व्यस्त असणे पतीला सहन झालं नाही आणि हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलिसांनी पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण काहीही साध्य झालं नाही.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2022, 4:34 pm
लखनऊ: सध्याच्या लाईफस्टाइलमध्ये मोबाईल हा लोकांना त्यांच्या सर्वात जवळचा झाला आहे. या मोबाईलच्या अतिवापरामुळे नातेसंबंध बिघडत आहेत. मोबाईलमुळे एकप्रकारे दुरावा संपला असला तरी जवळच्या नात्यांमधील दुरावा वाढत चालला आहे. मोबाईलमुळे वैवाहिक संबंध बिघडत असल्याच्याही अनेक घटना पुढे येत असतात. असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये घडलं आहे. जिथे मोबाईलमुळे वर्षभरातच लग्न तुटले आहे. या जोडप्याला पोलिसांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण, महिलेने सांगितले की ती पतीला सोडू शकते, पण मोबाईल नाही. पंचायत झाल्यानंतर दोघे वेगळे झाले आणि एकमेकांचे सामान परत केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mobile is the Reason for Divorce
वर्षभरातच संसार मोडला


बिरनो पोलीस स्टेशन हद्दीतील गजपतपूर येथे राहणारी अनिताचा रमाकांतसोबत १० जून २०२१ ला विवाह झाला होता. रमाकांत हा गुजरातमध्ये खासगी नोकरी करतो. पंधरा दिवसांपूर्वी रमाकांत घरी आला असता अनिताही तिच्या माहेरून सासरी परतली होती. ती नेहमी मोबाईलमध्ये व्यस्त असायची. कधी ती कोणाशी तरी बोलत राहायची, तर तर कधी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर व्यस्त असायची.

हेही वाचा -पुण्यात 'एकावर एक फ्री'चं आमिष भोवलं, ४०० रुपयांची थाळी ३ लाखांना पडली, पाहा नेमकं काय घडलं?

पत्नीचा मारहाणीचा आरोप

मोबाईलवरुन दोघांमध्ये भांडण झाले. बुधवारी अनिताने कासीमाबाद पोलीस ठाणे गाठले आणि पतीवर मारहाणीचा आरोप केला. पोलिसांनी पतीला पोलीस ठाण्यात बोलावले. दोघांच्या नातेवाईकांनीही पोलीस ठाणे गाठले.

हेही वाचा -Signal From Space: अंतराळातून ८२ तासांत जवळपास २००० रहस्यमयी सिग्नल, शास्त्रज्ञांची झोप उडाली...

पोलिसांनी विवाहितेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, काही निष्पन्न झाले नाही. तिने स्पष्टपणे सांगितले की ती तिच्या पतीला सोडू शकते, परंतु मोबाईल नाही. यानंतर पोलिसांनी हे प्रकरण पंचायतीकडे सोपवले. तासभर चाललेल्या पंचायतीनंतर दोघे वेगळे झाले आणि एकमेकांचे सामान परत केले. रमाकांत आणि अनिता यांचा प्रेमविवाह झाला होता.

हेही वाचा -समुद्राच्या पोटात सापडला १३०० वर्ष जुना खजिना, सोनं-चांदी, हिरे, मोती नव्हे; २०० माठांतून निघाल्या वेगळ्याच वस्तू
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख