अ‍ॅपशहर

नितीशकुमारांचं काय होणार?, 'बिहारमध्ये आम्ही भाजप-लोजपाचे सरकार बनवू'

बिहार निवडणुकीत जेडीयू नेते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांची कोंडी होताना दिसतेय. नितीशकुमार यांनी भाजपशी युती केलीय. पण त्यांना चिराग पासवान, तेजस्वी यादव आणि काँग्रेसचा सामना करावा लागतोय. तर चिराग पासवान यांनी भाजपसोबत सत्ता स्थापनेचे संकेत दिलेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2020, 1:40 am
पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीच्या ( bihar election ) काही दिवस आधी लोकजशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान ( chirag pawan ) यांनी नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. 'आपण सरकार बनवू यात शंका नाही. आपले सरकार बनले तर आम्ही सीता मंदिराची पायाभरणी करू. किमान आता जे मुख्यमंत्री आहेत ते पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील भाजप-लोजपाचे सरकार बनवू', असं चिराग पासवान म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chirag paswan
'आताचे मुख्यमंत्री हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, आम्ही भाजप-लोजपाचे सरकार बनवू'


चिराग यांनी मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. लोकजशक्ती पार्टीची सत्ता आल्यास सीतामढीमध्ये सीता मंदिर ( sita temple ) बांधले जाईल. आपण मोदींचे हनुमान आहोत असं म्हणत चिराग पासवान यांनी राम मंदिरापेक्षाही मोठं सीता मंदिर बांधणार असल्याचं सांगतिलं. एएनआयने हे वृत्त दिलंय.

राम सीतेशिवाय अपूर्ण आहे आणि त्याचप्रमाणे सीता रामाशिवाय अपूर्ण आहे. अयोध्येतील राम मंदिर सीतामढीच्या सीता मंदिराशी जोडण्यासाठी एक कॉरीडोरही बांधला जाईल, असं चिराग पासवान म्हणाले. सीतामढीतील पुनौरा धाम इथं पूजा करण्यासाठी चिराग पासवान आले होते.

व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राम-सीता कॉरिडॉरचा उल्लेख आहे

'बिहार फर्स्ट-बिहारी फर्स्ट'च्या व्हिज्युअल डॉक्युमेंटमध्ये सीता मंदिर बांधण्याचं आश्वासन दिलं आहे. यासह मंदिराच्या सभोवतालच्या क्षेत्राचा विकासही करण्यात येईल. अयोध्या सीतामढीला जोडणारा सहा पदरी कॉरिडॉरही बांधण्यात येईल. हा रस्ता बिहार-उत्तर प्रदेश सीमेपर्यंत बांधला जाईल आणि त्याचं नाव सीता-राम कॉरिडोर असे असेल, असं चिराग पासवान म्हणाले.

नितीशकुमारांनी मानेवर चश्मा का लावलाय? लालूंनी काढला चिमटा

करोनाविरोधी लढाईत भारताला मोठं यश, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के

बिहार विधानसभा निवडणुकीत लोकजशक्ती पार्टीने जेडीयू विरोधात उमेदवार उभे केलेत आहेत. पण भाजपविरोधात नाही. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहेत. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज