अ‍ॅपशहर

rahul gandhi: वर्षभरात २२ लाख नोकऱ्या देणार, राहुल गांधींचं आश्वासन

मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'न्याय योजने'ची घोषणा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता सत्तेत आल्यानंतर वर्षभरात २२ लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत या नोकऱ्या देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2019, 9:15 am
नवी दिल्ली: मतदारांना आकर्षित करण्यासाठी 'न्याय योजने'ची घोषणा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता सत्तेत आल्यानंतर वर्षभरात २२ लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत या नोकऱ्या देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul-gandhi5


राहुल गांधी यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केलेलं ट्विट महत्त्वाचं मानलं जात आहे. 'सध्या देशात विविध खात्यातील २२ लाख पदे रिक्त आहेत. आमची सत्ता आल्यास ३१ मार्च २०२० पर्यंत ही सर्वच्या सर्व २२ लाख पदे भरण्यात येतील,' असं राहुल यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारकडून आरोग्य आणि शिक्षणासाठी निधी हस्तांतरीत केला जातो. त्याच्याशी ही सर्व रिक्तपदे लिंक करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, रविवारी विजयवाडा येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. भारताचं संविधान बदलण्याचं मोदी सरकारचं अंतिम ध्येय आहे. कारण आरएसएसचं स्वप्न पूर्ण करण्यात संविधानाचा अडथळा आहे. त्यामुळेच त्यांना संविधान बदलायचं असून काँग्रेस पक्ष हे कदापिही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज