नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी आज वादग्रस्त तीन नवीन कृषी मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवरच्या भूमिकेवर टीका होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं हे यश आहे, असं विरोधकांनी म्हटलं आहे. तर केंद्रातील सत्ताधारी भाजपला आपल्याच पक्षाचे नेते सुब्रमण्यन स्वामी घरचा अहेर दिला आहे. स्वामींनी ट्विट करत चीनवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला, हे आतातरी मोदी कबुल करतील का? असा सवाल सुब्रमण्यन स्वामींनी ( subramanian swamy ) उपस्थित केला आहे.
काय म्हणाले सुब्रमण्यन स्वामी?
सुब्रमण्यन स्वामी यांनी यासंदर्भात काही वेळापूर्वीच ट्विट केलं आहे. चीनने भारताच्या भूभागावर कब्जा केला आहे, हे आतातरी मोदी मान्य करतील का आणि मोदी आणि केंद्र सरकार देशाची एक-एक इंच जमीन चीनच्या तावडीतून सोडवतील का? असा प्रश्न सुब्रमण्यन स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. स्वामींच्या या ट्विटमुळे सत्ताधारी भाजपची अडचण झाली आहे.
चर्चा पुन्हा सुरू करण्यावर भारत-चीनचे एकमत
सीमावाद सोडवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये गुरुवारी १४ व्या फेरीची बैठक झाली. सीमेच्या पश्चिम सेक्टरमध्ये एलएसीच्या स्थितीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. यापूर्वी १० ऑक्टोबरला दोन्ही देशाच्यां वरिष्ठ कमांडर्समध्ये बैठक झाली होती. त्यानंतर काय प्रगती झाली? याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, चीनने अरुणचाल प्रदेशच्या सीमावर्ती वादग्रस्त भागात आणखी एक गाव वसल्याचं समोर आलं आहे. उपग्रह फोटोंद्वारे चीनची आणखी एक कुरापत समोर आली आहे.
काय म्हणाले सुब्रमण्यन स्वामी?
सुब्रमण्यन स्वामी यांनी यासंदर्भात काही वेळापूर्वीच ट्विट केलं आहे. चीनने भारताच्या भूभागावर कब्जा केला आहे, हे आतातरी मोदी मान्य करतील का आणि मोदी आणि केंद्र सरकार देशाची एक-एक इंच जमीन चीनच्या तावडीतून सोडवतील का? असा प्रश्न सुब्रमण्यन स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. स्वामींच्या या ट्विटमुळे सत्ताधारी भाजपची अडचण झाली आहे.
चर्चा पुन्हा सुरू करण्यावर भारत-चीनचे एकमत
सीमावाद सोडवण्यासाठी भारत आणि चीनमध्ये गुरुवारी १४ व्या फेरीची बैठक झाली. सीमेच्या पश्चिम सेक्टरमध्ये एलएसीच्या स्थितीवर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. यापूर्वी १० ऑक्टोबरला दोन्ही देशाच्यां वरिष्ठ कमांडर्समध्ये बैठक झाली होती. त्यानंतर काय प्रगती झाली? याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, चीनने अरुणचाल प्रदेशच्या सीमावर्ती वादग्रस्त भागात आणखी एक गाव वसल्याचं समोर आलं आहे. उपग्रह फोटोंद्वारे चीनची आणखी एक कुरापत समोर आली आहे.