जयपूर : येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष २०१४ च्या निवडणुकीत जितक्या जागांवर जिंकला होता, त्यापेक्षा अधिक जागांवर निवडून येईल, असा विश्वास मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. जावडेकर म्हणाले, 'लोकसभेच्या २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत २८२ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. यंदा होणाऱ्या निवडणुकीत त्यापेक्षा जास्त जागांवर विजय मिळेल. मोदी सरकारने दहशतवादाविरोधात कारवाई केली असून, देशाला सशक्त नेतृत्व दिले आहे.' निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या बाइक रॅलीला जावडेकर उपस्थित होते.
‘अधिक जागा जिंकू’
येत्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष २०१४ च्या निवडणुकीत जितक्या जागांवर जिंकला होता, त्यापेक्षा अधिक जागांवर निवडून येईल, असा विश्वास मनुष्यबळ ...
30 3 Mar 2019, 4:00 am