अ‍ॅपशहर

४८ तासात एकाच महिलेचं दोनदा लग्न, पहिलं भाच्याशी मग पतीसोबत, ही प्रेम कहाणी तुमचं डोकं फिरवेल

Love Story: बबलू शर्मा नावाच्या या व्यक्तीने सुनिता नावाच्या महिलेसोबत १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचा सुखी संसार सुरु असताना एका लग्न समारंभात सुनिताची भेट संतोष या दूरच्या नातेवाईकाशी झाली जो नात्यात तिचा भाजा लागत होता. संतोष हा चौथम पोलीस ठाण्याच्या मालपा गावचा रहिवासी होता.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2022, 2:30 pm
पाटणा: आजवर तुम्ही अनेक प्रेम कहाण्या वाचल्या असतील. पण, बिहारची ही प्रेम कहाणी त्या सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे. येथे लग्नाच्या १२ वर्षानंतर मामी भाच्याच्या प्रेमात पडली. जेव्हा त्यांच्या या नात्याबाबत माहिती झालं तेव्हा पतीने 'हम दिल दे चुके सनम'च्या अजय देवगनप्रमाणे आपल्या प्रेमाचा त्याग केला आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं. मात्र, इथे पुन्हा एक ट्विस्ट आला. भाचा लग्न करुन आणलेल्या मामीला २४ तासाच्या आत सोडून पळून गेला आणि मामीला पुन्हा आपल्या पहिल्या पतीकडे परतावं लागलं. काय आहे हे प्रकरण आणि नात्यांचा जांगडगुत्ता ज्याने संपूर्ण गावाला चक्रावून सोडलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Bihar Marriage Story


बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील महेशखुंट पोलीस स्टेशन परिसरातील काजीचक पंचायतीत एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जिथे एका पतीच्या त्यागाने सर्वांचीच मनं जिंकली. बबलू शर्मा नावाच्या या व्यक्तीचे सुनिता नावाच्या महिलेसोबत १२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचा सुखी संसार सुरु असताना एका लग्न समारंभात सुनिताची भेट संतोष या दूरच्या नातेवाईकाशी झाली जो नात्यात तिचा भाजा लागत होता. संतोष हा चौथम पोलीस ठाण्याच्या मालपा गावचा रहिवासी होता.

हेही वाचा -Malad Fire VIDEO: मुंबईत २१ मजली इमारतीत भीषण आग, युवतीने बाल्कनीतून उडी घेत जीव वाचवला

पतीकडून त्याग, पत्नीचं प्रियकराशी लग्न लावलं

दोघांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. बबलू हा गवंडी असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी तो नेहमी घराबाहेर असायचा. भाचा संतोष त्याच्या अनुपस्थितीत नेहमी मामाच्या घरी येऊ लागला. बबलूला याची शंका आली. एक दिवस या दोघांनाही त्याने आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. गावातील समाजातील लोक त्यांच्या घरी जमा झाले. यावेळी बबलूने मोठं मन दाखवत आपल्या प्रेमाचा त्याग करून पत्नी सुनिताचं आपल्याच भाच्याशी लग्न लावून दिलं.

गावात गोंधळ

या प्रकरणाने गावात एकच गोंधळ उडाला. गावातील लोकांच्या उपस्थितीतच संतोषने मामी सुनिताशी लग्न केलं. सुनिताचे कुटुंबीयही या लग्नाचे साक्षीदार झाले. इतकंच नाही तर एक करारही करण्यात आला, ज्याअंतर्गत सुनिताने लिहिलं होतं की ती आपल्या पतीला स्वेच्छेने सोडून जात आहे आणि ती प्रियकर संतोष कुमारसोबत राहू इच्छित आहे. तसेच, यानंतर ती तिच्या पहिल्या पतीशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

हेही वाचा -बिअर रडवणार! कंपनीकडून किमती वाढवण्याचा निर्णय, पण कारण काय?

आणि मग आला कहाणीत ट्विस्ट

पण, संतोष आणि सुनिता यांचं लग्न ४८ तासही टिकू शकले नाही. मामीशी लग्न करुन जेव्हा संतोष त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी याचा तीव्र विरोध केला. त्यांचं लग्न हे बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. घरच्यांचा विरोध पाहून संतोषचा धीर सुटला. तो पत्नी सुनिताला तिथेच सोडून पळून गेला.

संतोष अचानक फरार झाल्यानंतर सुनितालाही आपली चूक कळली. तिला बबलूचे प्रेम आठवले. कशीतरी हिंमत एकवटून ती तिचा पहिला नवरा बबलूच्या घरी पोहोचली. सुरुवातीला बबलूने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला. पण, नंतर लोकांनी त्याला समजावलं आणि सुनिताची अवस्था पाहून त्याने तिला सोबत ठेवण्यास होकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा सुनिताचे लग्न ठरले. तिच्या भांगेत कुंकू भरुन त्याने तिचा पत्नी म्हणून स्विकार केला.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख