जयपूरः नागरिकत्व संशोधन कायद्यावरून देशभर वाद-विवाद सुरू असताना पाकिस्तानात जन्मलेली एक महिला भारतात सरपंच बनली आहे. पाकिस्तानात जन्मलेल्या नीता कंवर टोंक या पंचायतीच्या सरपंच बनल्या आहेत. नटवारा ग्राम पंचायत निवडणूक लढवणाऱ्या नीता कंवर यांचा जन्म पाकिस्तानच्या सिंध प्रांतात झाला होता. परंतु, २००१ साली त्या जोधपूरला आल्या होत्या. १९ वर्षानंतर त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले होते.
नीता आपली मोठी बहिण अंजना सोढा यांच्यासोबत सिंधच्या मीरपूर-खास हून जोधपूरला आल्या होत्या. सप्टेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व मिळाल्यानंतर १७ जानेवारी रोजी नीता यांनी राजस्थान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. निवडणूक निकालानंतर नीता यांचा विजय झाला. नीता यांना १०३५ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सोनू देवी यांचा त्यांनी ३६२ मतांनी पराभव केला. या विजयानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. गावची सरपंच महिला बनल्याने मला आनंद झाला आहे. या गावची सून आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी मला सहकार्य केले. मी या गावची सरपंच बनेल असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते, असे विजायनंतर नीता यांनी म्हटले आहे.
भारतात आल्यानंतर नागरिकत्व मिळवण्यासाठी नीता यांनी अर्ज केला त्यावेळी त्यांचा अर्ज चार वेळा नामंजूर करण्यात आला होता. पाचव्यांदा त्यांचा अर्ज स्वीकारला गेला. टोंकमधील नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करणारी मी पहिला महिला आहे. नागरिकत्व मिळवण्यासाठी मला खूप कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या, असेही नीता यांनी सांगितले. अनेकदा तर जयपूरपर्यंत जावे लागले. महिला सबलीकरण आणि चांगल्या शिक्षणासाठी मला काम करायचे आहे, असेही नीता यांनी सांगितले.
'काश्मीरमध्ये इंटरनेटवर डर्टी पिक्चर बघतात'
शबाना आझमी अपघात: वाचा वैद्यकीय अहवाल
नीता आपली मोठी बहिण अंजना सोढा यांच्यासोबत सिंधच्या मीरपूर-खास हून जोधपूरला आल्या होत्या. सप्टेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व मिळाल्यानंतर १७ जानेवारी रोजी नीता यांनी राजस्थान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. निवडणूक निकालानंतर नीता यांचा विजय झाला. नीता यांना १०३५ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सोनू देवी यांचा त्यांनी ३६२ मतांनी पराभव केला. या विजयानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला. गावची सरपंच महिला बनल्याने मला आनंद झाला आहे. या गावची सून आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी मला सहकार्य केले. मी या गावची सरपंच बनेल असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते, असे विजायनंतर नीता यांनी म्हटले आहे.
भारतात आल्यानंतर नागरिकत्व मिळवण्यासाठी नीता यांनी अर्ज केला त्यावेळी त्यांचा अर्ज चार वेळा नामंजूर करण्यात आला होता. पाचव्यांदा त्यांचा अर्ज स्वीकारला गेला. टोंकमधील नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करणारी मी पहिला महिला आहे. नागरिकत्व मिळवण्यासाठी मला खूप कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या, असेही नीता यांनी सांगितले. अनेकदा तर जयपूरपर्यंत जावे लागले. महिला सबलीकरण आणि चांगल्या शिक्षणासाठी मला काम करायचे आहे, असेही नीता यांनी सांगितले.
'काश्मीरमध्ये इंटरनेटवर डर्टी पिक्चर बघतात'
शबाना आझमी अपघात: वाचा वैद्यकीय अहवाल