अ‍ॅपशहर

Coronavirus : कुटुंबातील व्यक्तीच वाढवत आहेत वृद्धांच्या समस्या

Coronavirus : करोना संक्रमणा दरम्यान कामानिमित्तानं घराबाहेर पडणाऱ्या तरुणांमुळे कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींमध्ये करोना संक्रमणाचा धोका सर्वाधिक असल्याचं एका अभ्यासात समोर आलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Oct 2020, 5:19 pm
नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिसतंय. देशात रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचं प्रमाण) सुधारताना दिसत आहे. परंतु, याच दरम्यान समोर आलेल्या एका अभ्यासानंतर वयोवृद्ध व्यक्तींना असलेल्या करोनाच्या धोक्यावरून सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. वृद्धांमध्ये करोनाचा सर्वाधिक धोका त्यांच्याच घरातील कामानिमित्तानं घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींपासून आणि शेजाऱ्यांपासून असल्याचं समोर आलंय. नुकत्याच समोर आलेल्या, 'लान्सेट'च्या अभ्यासानुसार भारतात अनेक जण संयुक्त कुटुंब पद्धतीत राहतात. अशा वेळी छोट्या जागेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणंही कठीण होऊन बसतं. त्यामुळे वृद्धांपर्यंत करोना संक्रमण सहजच पोहचू शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Coronavirus : कुटुंबातील व्यक्तीच वाढवत आहेत वृद्धांच्या समस्या
कुटुंबातील व्यक्तीच वाढवत आहेत वृद्धांच्या समस्या (प्रातिनिधिक फोटो)


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वृद्ध व्यक्तींचा रोगप्रतिकारक शक्ती वयोमानाप्रमाणे अगोदरपासून कमी असू शकते, तसंच त्यांना काही शारीरिक समस्याही असू शकतात. त्यातच करोनामुळे त्यांच्या जीविताला धोका आणखीन वाढतो.

फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. मनोज कुमार गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सामान्यत: एक व्यक्ती संक्रमित आढळली तर त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही संक्रमित आढळतात. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर एकाच घरात राहणाऱ्या नागरिकांना वयोवृद्ध व्यक्तींपासून शारीरिक अंतर ठेवण्याचा आणि वृद्धांची काळजी न करण्याचा आम्ही सल्ला देतो.

वाचा : मुंगेर गोळीबार : जमावाचा पोलीस स्टेशनजवळ धिंगाणा, गाड्या पेटवल्या
वाचा : मोदींचे 'राजकीय गुरू' - गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन


डॉ. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार ७० किंवा त्याहून अधिक वयांच्या २,७९,९६१ व्यक्तींवर हा अभ्यास करण्यात आला. ७० वर्षाहून अधिक वयांच्या नागरिकांचा मृत्यूदर हा २० टक्क्यांहून अधिक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गर्दीच्या ठिकाणी किंवा झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या नागरिकांना करोना संक्रमणाचा धोका सर्वाधिक आहे. कारण, व्यावहारिकरित्या सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं इथं शक्य होत नाही. तसंच जागरुकता नसल्यामुळे समस्यांमध्ये आणखीन वाढ होते.

धर्मपाल नारायण सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे सल्लागार डॉ. नवनीत सूद यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही या धोक्यापासून सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची गोष्ट करू शकता ती म्हणजे मास्कचा वापर करणं. तसंच काही समस्या किंवा लक्षणं जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं. नागरिकांनी नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे.

वाचा : Indian Railway :आजपासून तीन विशेष शताब्दी रेल्वे
वाचा :
हेलिकॉप्टरचं एमर्जन्सी लँडींग, थोडक्यात बचावले मनोज तिवारी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज