अ‍ॅपशहर

८० % मिळवूनही अॅडमिशन नाही; आता शेती करतो

तिरुवनंतपुरमच्या एका मुलाची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होऊ लागली आहे. लीजो जॉय असे या मुलाचे नाव आहे. लीजोला १२ वीच्या परीक्षेत ७९.७ टक्के गुण मिळाले. मात्र त्याला पाचव्या यादीनंतरही प्रवेश मिळू शकला नाही. यामुळे निराश झालेल्या लीजोने शेवटी शेती करण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra Times 17 Jul 2017, 7:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त। तिरुवनंतपुरम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम you made me a farmer
८० % मिळवूनही अॅडमिशन नाही; आता शेती करतो


तिरुवनंतपुरमच्या एका मुलाची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होऊ लागली आहे. लीजो जॉय असे या मुलाचे नाव आहे. लीजोला १२ वीच्या परीक्षेत ७९.७ टक्के गुण मिळाले. मात्र त्याला पाचव्या यादीनंतरही प्रवेश मिळू शकला नाही. यामुळे निराश झालेल्या लीजोने शेवटी शेती करण्याचा निर्णय घेतला.

लीजोने फावड्यासोबत आपला फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. सध्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत आरक्षणाची वाईट पद्धत आहे. याच कारणामुळे आपल्याला शेतीची निवड करावी लागली असेही लीजोने लिहिले आहे.



शेतकरी होण्याचा आपल्याला गर्व असल्याचे लीजो म्हणतो. परंतु, आपल्याला समाजाने शेतकरी बनवले आहे असेही त्याचे म्हणणे आहे. आरक्षणाच्या धोरणामुळे केवळ ५० टक्के गुण मिळवणाऱ्या आपल्या मित्रांना देखील प्रवेश मिळत आहे असे लीजो म्हणतो. लीजोची ही पोस्ट व्हायरल होत आहे हे विशेष.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज