अ‍ॅपशहर

कंटाळलो तुला, आयुष्य संपवतोय! साखरपुड्याच्या पाच दिवसांनंतर तरुणाचा कॉल; दुसऱ्याच क्षणी...

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील मोहनलालगंज परिसरात वास्तव्यास असलेल्या तरुणानं आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. साखरपुडा झाल्यानंतर ५ दिवसांनी तरुणानं आयुष्य संपवलं.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2023, 7:14 pm
लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील मोहनलालगंज परिसरात वास्तव्यास असलेल्या तरुणानं आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. साखरपुडा झाल्यानंतर ५ दिवसांनी तरुणानं आयुष्य संपवलं. दिलीप कुमार असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यानं प्रेयसीला फोन केला होता. मी तुला कंटाळलो आहे, असं दिलीप फोनवर प्रेयसीला म्हणाला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम youth ends life


मी आता माझं आयुष्य संपवतो आहे, असं म्हणून दिलीप कुमारनं कॉल कट केला. तरुणीनं याची माहिती दिलीपच्या नातेवाईकांना दिली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. बिजनौरच्या शिवगुलामखेडा गावचा रहिवासी असलेल्या दिलीपचा मृतदेह शनिवारी सकाळी मोहनलालगंजमध्ये एका आंब्याच्या झाडाला लटकलेला आढळून आला होता. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
प्रेयसीला भेटायला गच्चीत, तितक्यात मुलीची आई आली; प्रियकर घाबरला अन् नको ते करून गेला
गर्लफ्रेंड ब्लॅकमेल करत असल्याचा उल्लेख दिलीपनं सुसाईड नोटमध्ये केला होता. तुझ्याविरोधात तक्रार दाखल करून तुला तुरुंगात टाकेन, अशी धमकी प्रेयसी द्यायची. ब्लॅकमेलिंगच्या खेळात तिच्या तीन मैत्रिणींचादेखील सहभाग आहे. या चौघी रामभरोसे मैकूलाल इंटरकॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत, असं दिलीपनं नोटमध्ये नमूद केलं आहे.

आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा पोलिसांनी चौघींविरोधात दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केलं आहे. लवकरच आरोपींची चौकशी केली जाईल. सगळ्या आरोपी अल्पवयीन असाव्यात असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्याचं कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितलं.
काळोख्या रात्री नग्न महिला येते, घराची बेल वाजवते; रहिवासी घाबरले, पोलीस म्हणाले, 'ती' तर..
दिलीपच्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एक टोळी तरुणांना फसवत असल्याचा प्रकार सुरुवातीच्या तपासातून समोर आला आहे. आधी तरुणांना फसवायचं, त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करायचं, अशा पद्धतीनं ही टोळी काम करते. दिलीपचं लग्न ठरलं होतं. त्यामुळे आता वसुली बंद होईल, असं आरोपींना वाटलं. त्यामुळे त्यांनी दिलीपला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. दिलीप त्यांच्या जाळ्यात अडकला होता. त्यातून बाहेर पडू न शकल्यानं त्यानं आत्महत्या केली.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख