दानापूर: बिहारच्या दानापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा चाकूनं भोसकून खून झाल्याची घटना घडली आहे. मारेकऱ्यांनी तरुणाचं गुप्तांगदेखील कापलं आणि घटनास्थळावरून फरार झाले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरू केला.
मारेकऱ्यांची संख्या तीन ते चार असावीत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडू असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. दानापूर झुनझुनवाला रस्त्याच्या शेजारी राहणारा राहुल कुमार धोबी टोला येथे त्याच्या मित्राच्या घरी झोपला होता. त्यावेळी तीन-चार जण तिथे पोहोचले. तुझ्या आईची प्रकृती बिघडली अशी बतावणी करून त्याला तिथून घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी राहुलची गळा चिरून हत्या केली. त्याचं गुप्तांगदेखील कापलं.
हातातोंडाशी आलेला तरुण मुलगा अचानक गेल्यानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मंगळवार रात्रीपासून मुलगा बेपत्ता होता. आम्ही त्याला अनेक ठिकाणी शोधलं. त्याच्या मित्रांकडे विचारणा केली. मात्र काहीच माहिती मिळाली नाही, असं राहुलची आई सोनी देवीनं सांगितलं. जुन्या वादातून मुलाची हत्या झाल्याचं समजल्याचं त्या पुढे म्हणाल्या.
राहुल नावाच्या मुलाचा चाकूनं गळा कापून खून करण्यात आल्याची माहिती दानापूर ठाण्याचे प्रभारी कमलेश्वर प्रसाद यांनी दिली. राहुलच्या गुप्तांगावरदेखील वार करण्यात आले. मृताच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
मारेकऱ्यांची संख्या तीन ते चार असावीत असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडू असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. दानापूर झुनझुनवाला रस्त्याच्या शेजारी राहणारा राहुल कुमार धोबी टोला येथे त्याच्या मित्राच्या घरी झोपला होता. त्यावेळी तीन-चार जण तिथे पोहोचले. तुझ्या आईची प्रकृती बिघडली अशी बतावणी करून त्याला तिथून घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी राहुलची गळा चिरून हत्या केली. त्याचं गुप्तांगदेखील कापलं.
हातातोंडाशी आलेला तरुण मुलगा अचानक गेल्यानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मंगळवार रात्रीपासून मुलगा बेपत्ता होता. आम्ही त्याला अनेक ठिकाणी शोधलं. त्याच्या मित्रांकडे विचारणा केली. मात्र काहीच माहिती मिळाली नाही, असं राहुलची आई सोनी देवीनं सांगितलं. जुन्या वादातून मुलाची हत्या झाल्याचं समजल्याचं त्या पुढे म्हणाल्या.
राहुल नावाच्या मुलाचा चाकूनं गळा कापून खून करण्यात आल्याची माहिती दानापूर ठाण्याचे प्रभारी कमलेश्वर प्रसाद यांनी दिली. राहुलच्या गुप्तांगावरदेखील वार करण्यात आले. मृताच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.