अ‍ॅपशहर

श्रीलंकेत पुरातील बळींची संख्या १५१

श्रीलंकेत आलेल्या पुरातील बळींची संख्या रविवारी १५१ वर गेली. श्रीलंकेतील १५ जिल्ह्यांना या पुराचा तडाखा बसला असून एक लाख १४ हजार कुटुंबातील सुमारे साडेचार लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्राने रविवारी दिली.

Maharashtra Times 29 May 2017, 2:10 am
कोलंबो ः श्रीलंकेत आलेल्या पुरातील बळींची संख्या रविवारी १५१ वर गेली. श्रीलंकेतील १५ जिल्ह्यांना या पुराचा तडाखा बसला असून एक लाख १४ हजार कुटुंबातील सुमारे साडेचार लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्राने रविवारी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 151 deaths in sri lanka
श्रीलंकेत पुरातील बळींची संख्या १५१


हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर रविवारी मदत आणि बचाव कार्याने वेग घेतला. त्यानंतर मृतांची संख्या जाहीर करण्यात आली. श्रीलंकेत २००३ नंतर आलेला हा भीषण पूर आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे १५१ जणांचा मृत्यू झाला असून, ११२ जण बेपत्ता आहेत. सुमारे एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. श्रीलंकेतील पाऊस काही प्रमाणात ओसरला असून आज, सोमवारी नैऋत्य भागात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. समुद्रावरून जोरदार वारे वाहत असून पावसाच्या काळात वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतील एक हजार लष्करी जवान मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. भारताने शनिवारीच श्रीलंकेतील पूरग्रस्तांसाठी नौदलाची तीन जहाजे भरून मदत साहित्य पाठवले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज