नवी दिल्ली : शाळेतील माध्यान्ह भोजनातून २५ मुलांना विषबाधा होण्याची घटना बुधवारी दिल्लीतच्या नरेला भागात घडली. जेवणानंतर सुमारे २६ मुलांना पोटात दुखू लागले. त्यानंतर मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवसभराच्या उपचारानंत बहुतेक मुलांना सायंकाळी घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांतील हा दुसरा प्रकार असून, शनिवारीही माध्यान्ह भोजनानंतर दोन मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या जेवणात मृत पाल आढळली होती.
२५ मुलांना विषबाधा
शाळेतील माध्यान्ह भोजनातून २५ मुलांना विषबाधा होण्याची घटना बुधवारी दिल्लीतच्या नरेला भागात घडली जेवणानंतर सुमारे २६ मुलांना पोटात दुखू लागले...
Maharashtra Times 12 Jul 2018, 4:00 am