दुबई: करोना महासाथीच्या आजारामुळे संपूर्ण जगातील अर्थचक्र थांबले आहे. लॉकडाउनच्या काळात नोकरी गेल्याने सौदी अरेबियात रहात असलेल्या भारतीय कामगारांवर चक्क भीक मागण्याची वेळ आहे. भीक मागणाऱ्या भारतीय कामगारांची रवानगी डिटेंन्श कॅम्पमध्ये करण्यात आली.
हे कामगार तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्रातील आहेत. यातील बहुतांशी कामगारांचा काम करण्याच्या परवान्याची मुदत संपली आहे. नोकरी नसणे आणि परवान्याची मुदत संपणे या कारणांमुळे भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ आली. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पोटभरण्यासाठी भीक मागितली एवढाच गुन्हा आपण केला असल्याचे या कामगारांनी सांगितले. सौदीच्या अधिकाऱ्यांनी कामगार रहात असलेल्या भाडेतत्वावरील घरात जाऊन त्यांची ओळख पटवली आणि त्यांना जेदाह येथील डिटेन्श सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
वाचा: गरिबाला जीव नसतो का? जगातील १३ टक्के लोकसंख्येसाठी ५० टक्के लस खरेदी
वाचा: युरोपमध्ये करोनाची दुसरी लाट! स्पेन, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्बंध
या कामगारांमध्ये उत्तर प्रदेशमधील ३९, बिहारमधील १०, तेलंगण व कर्नाटकमधील प्रत्येकी पाच, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमधील प्रत्येकी चार कामगार असल्याची माहिती समजली आहे.
वाचा: मध्य-पूर्व भागात मैत्री पर्व; युएई, बहरीन व इस्रायल यांचा करार
अनेक कामगार ओढावलेल्या परिस्थितीमुळे पूर्णपणे हताश झाले आहेत. नोकरी गेल्यामुळे उत्पन्नाचे काहीच साधन नसल्यामुळे आम्हाला भीक मागावी लागत होती. या गुन्ह्यासाठी आम्हाला आता डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आले असल्याचे काही कामगारांनी सांगितले. पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामगारांना पुन्हा त्यांच्या देशात नेले असल्याचेही कामगारांनी सांगितले.
सौदी अरेबियातील सामाजिक कार्यकर्ते अमजद उल्लाह खान यांनी सांगितले की, स्थानिक अधिकाऱ्यांनी कामाच्या परवान्याची मुदत संपलेल्या या भारतीय कामगारांची रवानगी डिटेन्शन सेंटरमध्ये केली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले.
वाचा: तीन वर्षांपूर्वीच 'या' राष्ट्रपतीला ठार करणार होतो; ट्रम्प यांचा खळबळजनक खुलासा
यातील काही कामगारांनी आपल्या व्यथाही मांडल्या आहेत. एकाने कामगाराने सांगितले की, माझ्या भावाचे निधन झाले असून आईची प्रकृतीही चिंताजनक आहे. मला भारतात परतायचे आहे. अमजद यांनी भारतीय कामगारांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी आणि भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना याबाबत एक पत्र लिहीले असून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
हे कामगार तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्रातील आहेत. यातील बहुतांशी कामगारांचा काम करण्याच्या परवान्याची मुदत संपली आहे. नोकरी नसणे आणि परवान्याची मुदत संपणे या कारणांमुळे भारतीय कामगारांवर भीक मागण्याची वेळ आली. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पोटभरण्यासाठी भीक मागितली एवढाच गुन्हा आपण केला असल्याचे या कामगारांनी सांगितले. सौदीच्या अधिकाऱ्यांनी कामगार रहात असलेल्या भाडेतत्वावरील घरात जाऊन त्यांची ओळख पटवली आणि त्यांना जेदाह येथील डिटेन्श सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
वाचा: गरिबाला जीव नसतो का? जगातील १३ टक्के लोकसंख्येसाठी ५० टक्के लस खरेदी
वाचा: युरोपमध्ये करोनाची दुसरी लाट! स्पेन, फ्रान्स, ब्रिटनमध्ये निर्बंध
या कामगारांमध्ये उत्तर प्रदेशमधील ३९, बिहारमधील १०, तेलंगण व कर्नाटकमधील प्रत्येकी पाच, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकमधील प्रत्येकी चार कामगार असल्याची माहिती समजली आहे.
वाचा: मध्य-पूर्व भागात मैत्री पर्व; युएई, बहरीन व इस्रायल यांचा करार
अनेक कामगार ओढावलेल्या परिस्थितीमुळे पूर्णपणे हताश झाले आहेत. नोकरी गेल्यामुळे उत्पन्नाचे काहीच साधन नसल्यामुळे आम्हाला भीक मागावी लागत होती. या गुन्ह्यासाठी आम्हाला आता डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आले असल्याचे काही कामगारांनी सांगितले. पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामगारांना पुन्हा त्यांच्या देशात नेले असल्याचेही कामगारांनी सांगितले.
सौदी अरेबियातील सामाजिक कार्यकर्ते अमजद उल्लाह खान यांनी सांगितले की, स्थानिक अधिकाऱ्यांनी कामाच्या परवान्याची मुदत संपलेल्या या भारतीय कामगारांची रवानगी डिटेन्शन सेंटरमध्ये केली आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले.
वाचा: तीन वर्षांपूर्वीच 'या' राष्ट्रपतीला ठार करणार होतो; ट्रम्प यांचा खळबळजनक खुलासा
यातील काही कामगारांनी आपल्या व्यथाही मांडल्या आहेत. एकाने कामगाराने सांगितले की, माझ्या भावाचे निधन झाले असून आईची प्रकृतीही चिंताजनक आहे. मला भारतात परतायचे आहे. अमजद यांनी भारतीय कामगारांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी आणि भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना याबाबत एक पत्र लिहीले असून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.