अ‍ॅपशहर

आघाडीसाठी पवारांची भूमिका महत्त्वाची

उत्तर प्रदेश आणि बिहारव्यतिरिक्त तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि आसाम या राज्यांमध्ये काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये युती होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. देशातील सर्वच राज्यांतील नेत्यांशी शरद पवार यांचे सौहार्दाचे संबंध असल्यामुळे भाजपविरोधात विरोधी पक्षांना एकजूट करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध आघाडी उघडण्याविषयी पवार अतिशय सकारात्मक असून, राहुल गांधींशी आता त्यांचा उत्तम संवाद होत असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

Maharashtra Times 16 Mar 2018, 3:00 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad-pawar


उत्तर प्रदेश आणि बिहारव्यतिरिक्त तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि आसाम या राज्यांमध्ये काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये युती होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. देशातील सर्वच राज्यांतील नेत्यांशी शरद पवार यांचे सौहार्दाचे संबंध असल्यामुळे भाजपविरोधात विरोधी पक्षांना एकजूट करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध आघाडी उघडण्याविषयी पवार अतिशय सकारात्मक असून, राहुल गांधींशी आता त्यांचा उत्तम संवाद होत असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

मंगळवारी रात्री सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनानंतर राहुल गांधी यांचे शरद पवार यांच्यासोबत भेटण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार बुधवारी सायंकाळी शरद पवार यांचे निवासस्थान '६, जनपथ' येथे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील आघाडीविषयी तासभर चर्चा केली. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. देशभरात विविध प्रादेशिक पक्षांसोबत प्रस्थापित करावयाच्या व्यापक आघाडीविषयीही त्यांनी या बैठकीदरम्यान चर्चा केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज