वृत्तसंस्था, बीजिंग
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीवरून चीनने आगपाखड केली असतानाच, ‘अरुणाचल प्रदेश’ हा भारताचा भाग नाही, तो भारत-चीन सीमेचा वादग्रस्त भाग आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लू कांग यांनी केले आहे. आठवडाभराच्या अरुणाचल मुक्कामानंतर लामा परतल्याच्या दुसऱ्या दिवशी चीनने भारतावर टीकेच्या फैरी झाडल्या असून ‘लामांच्या अरुणाचल भेटीमुळे सीमावादावर तोडगा काढण्यावर विपरीत परिणाम झाला आहे. भारताने तिबेटच्या मुद्द्याबद्दल आपल्या वचनाचा भंग केला आहे,’ असा आरोप कांग यांनी केला.
आपल्या भूप्रदेशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी चीन योग्य ती पावले उचलेल, असे सांगत कांग यांनी दलाई लामा यांच्यावरही हल्ला चढवला. ‘दलाई लामा यांनी तिबेटच्या मुद्द्यावरून चीन सरकारवर टीका करून आपली राजकीय भूमिका उघड केली,’ असे टीकास्त्र कांग यांनी सोडले.
वृत्तपत्राचा दावा
‘दक्षिण तिबेटमधील नागरिक भारताच्या बेकायदा अंमलाखाली खडतर आयुष्य जगत आहेत. त्यांना अनेकप्रकारे भेदभावाला तोंड द्यावे लागत असून त्यांना पुन्हा चीनच्या सत्तेत येण्याची इच्छा आहे,’ अशी मुक्ताफळे चीनमधील सरकारी नियंत्रणातील ‘चायना डेली’ या वृत्तपत्राने अग्रलेखात उधळली आहेत. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने सातत्याने केला आहे.
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीवरून चीनने आगपाखड केली असतानाच, ‘अरुणाचल प्रदेश’ हा भारताचा भाग नाही, तो भारत-चीन सीमेचा वादग्रस्त भाग आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लू कांग यांनी केले आहे. आठवडाभराच्या अरुणाचल मुक्कामानंतर लामा परतल्याच्या दुसऱ्या दिवशी चीनने भारतावर टीकेच्या फैरी झाडल्या असून ‘लामांच्या अरुणाचल भेटीमुळे सीमावादावर तोडगा काढण्यावर विपरीत परिणाम झाला आहे. भारताने तिबेटच्या मुद्द्याबद्दल आपल्या वचनाचा भंग केला आहे,’ असा आरोप कांग यांनी केला.
आपल्या भूप्रदेशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी चीन योग्य ती पावले उचलेल, असे सांगत कांग यांनी दलाई लामा यांच्यावरही हल्ला चढवला. ‘दलाई लामा यांनी तिबेटच्या मुद्द्यावरून चीन सरकारवर टीका करून आपली राजकीय भूमिका उघड केली,’ असे टीकास्त्र कांग यांनी सोडले.
वृत्तपत्राचा दावा
‘दक्षिण तिबेटमधील नागरिक भारताच्या बेकायदा अंमलाखाली खडतर आयुष्य जगत आहेत. त्यांना अनेकप्रकारे भेदभावाला तोंड द्यावे लागत असून त्यांना पुन्हा चीनच्या सत्तेत येण्याची इच्छा आहे,’ अशी मुक्ताफळे चीनमधील सरकारी नियंत्रणातील ‘चायना डेली’ या वृत्तपत्राने अग्रलेखात उधळली आहेत. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने सातत्याने केला आहे.