अ‍ॅपशहर

चीन-पाकच्या 'CPEC' विरोधात गिलगिटमध्ये आंदोलन पेटले

एकिकडे पेइचिंगमध्ये चीनचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'वन बेल्ट वन रोड' (OBOR)संबंधी शिखर परिषद सुरू असताना दुसरीकडे मात्र पाक व्याप्त काश्मिरमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर(CPEC)च्या निर्माणाविरोधात शेकडो निदर्शक गिलगिट-बाल्टिस्तानात रस्त्यावर उतरले आहेत.

Maharashtra Times 15 May 2017, 12:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त। गिलगिट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम as china opens its obor summit anti cpec protests erupt in pok
चीन-पाकच्या 'CPEC' विरोधात गिलगिटमध्ये आंदोलन पेटले


एकिकडे पेइचिंगमध्ये चीनचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'वन बेल्ट वन रोड' (OBOR)संबंधी शिखर परिषद सुरू असताना दुसरीकडे मात्र पाक व्याप्त काश्मिरमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर(CPEC)च्या निर्माणाविरोधात शेकडो निदर्शक गिलगिट-बाल्टिस्तानात रस्त्यावर उतरले आहेत. चीनच्या 'वन बेल्ट वन रोड' प्रकल्पाचाच एक भाग असलेला CPEC प्रकल्प उभारून चीन पाकिस्तानच्या मदतीने बेकायदेशीरपणे गिलगिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे.

CPEC विरोधात गिलगिट, हुंजा, स्कर्दू आणि गीजर येथून कोराकोरम विद्यार्थी संघटना, बलावरिस्तान राष्ट्रीय विद्यार्थी संघटना, गिलगिट-बाल्टिस्तान संयुक्त चळवळ आणि बलावरिस्तान राष्ट्रीय आघाडी सारख्या सर्व विद्यार्थी आणि राजकीय संघटनांनी एकत्र येत निदर्शने सुरू केली आहेत. 'चीनी साम्राज्यवाद बंद करा.' या घोषणाफलकांसह निदर्शकांनी विश्व समुदायाला गिलगिटमध्ये चीनचे अतिक्रमण रोखण्यासंबंधी आवाहनही केले आहे. निदर्शकांच्या मते, चीन CPEC च्या बहाण्याने पाकिस्तानमध्ये आपले सैन्य पाठबळ वाढवत आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये चीन आपले लष्करी तळ ठोकण्याच्या प्रयत्नात असल्याचे गिलगिट-बाल्टिस्तान थिंकर्स फोरमचे संस्थापक वजाहत खान सांगतात. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी CPECचा हेतू साध्य करण्यासाठी इथे दडपशाही सुरू केली आहे. यातून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असून याबाबत सर्व राजकीय आणि मानवाधिकार संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

बलुचिस्तानात पुन्हा हिंसेचे वातावरण
गेल्या वर्षी सर्वसाधारण बदलांनंतर बलुचिस्तानात हिसंक वातावरण निर्माण झाले होते. पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूज इंटरनॅशनलच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील अन्य भागांमध्ये लष्करी कारवाई केल्यानंतरही हिंसक परिस्थिती तशीच होती. मागील ६ वर्षांमध्ये देशातील विविध भागांमधून साधारण १००० गोळ्यांनी भेदलेले कित्येक मृतदेह सापडले. ह्या वर्षी बॉम्बस्फोटाच्याही जवळ जवळ ८० घटना घडल्या. २०१६ मध्ये ३३१ निष्पाप लोक मारले गेले, तर २०१५ मध्ये हा आकडा २०२ इतका होता. पाकिस्तानातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक अशांत प्रांत असलेल्या बलुचिस्तानात दहशतवाद्यांनी कित्येक वेळेस फ्रंटिअर कोअर आणि पोलिसांना लक्ष्य केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज