अ‍ॅपशहर

ऑस्ट्रेलियाकडून शांततेचे आवाहन

भारताने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ल्याद्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 27 Feb 2019, 2:00 am
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानात घुसून हवाई हल्ल्याद्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानने 'जैश-ए-महम्मद'सह त्यांच्या भूमीवरून चालणाऱ्या सर्व दहशतवादी कारवाया तातडीने थांबविल्या पाहिजेत व अशा संघटनांवर अर्थपूर्ण व तातडीची कारवाई केली पाहिजे, असेही ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम australia


'भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी सद्यस्थितीत संयम पाळणे आवश्यक आहे. प्रादेशिक शांतता व सुरक्षितता धोक्यात येईल, असे कुठलेही कृत्य टाळावे आणि चर्चेच्या मार्गाने या समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढावा,' असे ऑस्ट्रेलियाच्या भारतातील दूतावासातर्फे प्रसृत करण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज