ढाका : बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळं ६० लाख लोक प्रभावित झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळं निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आलं आहे. पुराचं पाणी घरात घुसल्यानं ६० लाख लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. बांगलादेशच्या उत्तर पूर्व आणि उत्तरेकडील भागात नद्यांची पाणी पातळी वाढल्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी मदत केंद्रात ठेवण्यात आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५ जणांचा पूरस्थितीमुळं मृत्यू झाला आहे. बांगलादेशमधील पूर अनुमान आणि सूचना केंद्राच्या प्रवक्त्यांनी देशातील चार प्रमुख नद्यांपैकी दोन नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्यावर असल्याचं म्हटलं आहे. देशात २००४ प्रमाणं पूरस्थिती निर्माण झाल्याचं ते म्हणाले. सुनामगंजमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांनी घरांच्या छतांवर आश्रय घेतला होता. त्यानंतर नागरिकांना सुरक्षा दलांच्या बचाव पथकांनी बोटींच्या सहाय्यानं त्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचवलं आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सरकारचे मोठे पाऊल; सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी
मेघालय आणि बांगलादेशमधील ऊंच प्रदेशात सतत मुसळधार पाऊस सुरु असल्यानं पूरस्थिती निर्माण झाल्याच सांगितलं जात आहे. नद्यांची पाणी पातळी वाढल्यानं घरांमध्ये पाणी घुसलं आहे. वीज निर्मिती केंद्रांमध्ये पाणी घुसल्यानं वीज निर्मिती केंद्र देखील बंद करण्यात आली आहेत. परिणामी इंटरनेट आणि मोबाइल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुन्हा इथेनॉल तारणार साखर उद्योग; राज्यात नवीन ४० कारखान्यांत प्रकल्प, यंदाचे उद्दिष्ट ३०० कोटी लिटर
भारतात देखील आसाम आणि त्रिपुरामध्ये पूरस्थिती
भारतातील पूर्वेकडील राज्य आसाम आणि त्रिपुरा आणि मेघालय मध्ये देखील जोरदार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसामच्या २८ जिल्ह्यांमधील १९ लाख लोकांना पुरांचा फटका बसला आहे. पूर आणि जमीन खचल्यानं ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. आसामच्या होजई जिल्ह्यात बचावकार्य करणारी नाव उलटल्यानं ३ मुलं बेपत्ता झाली असून २१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात देखील पूरस्थिती निर्माण झाल्यानं दोन हजारांहून जणांना फटका बसला आहे.
भाजपमध्ये माझे दोनच नाही तर अनेक समर्थक आमदार, पण..., एकनाथ खडसेंनी खरं खरं सांगितलं!
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सरकारचे मोठे पाऊल; सुमारे नऊ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी
मेघालय आणि बांगलादेशमधील ऊंच प्रदेशात सतत मुसळधार पाऊस सुरु असल्यानं पूरस्थिती निर्माण झाल्याच सांगितलं जात आहे. नद्यांची पाणी पातळी वाढल्यानं घरांमध्ये पाणी घुसलं आहे. वीज निर्मिती केंद्रांमध्ये पाणी घुसल्यानं वीज निर्मिती केंद्र देखील बंद करण्यात आली आहेत. परिणामी इंटरनेट आणि मोबाइल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. पूरस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुन्हा इथेनॉल तारणार साखर उद्योग; राज्यात नवीन ४० कारखान्यांत प्रकल्प, यंदाचे उद्दिष्ट ३०० कोटी लिटर
भारतात देखील आसाम आणि त्रिपुरामध्ये पूरस्थिती
भारतातील पूर्वेकडील राज्य आसाम आणि त्रिपुरा आणि मेघालय मध्ये देखील जोरदार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसामच्या २८ जिल्ह्यांमधील १९ लाख लोकांना पुरांचा फटका बसला आहे. पूर आणि जमीन खचल्यानं ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. आसामच्या होजई जिल्ह्यात बचावकार्य करणारी नाव उलटल्यानं ३ मुलं बेपत्ता झाली असून २१ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात देखील पूरस्थिती निर्माण झाल्यानं दोन हजारांहून जणांना फटका बसला आहे.
भाजपमध्ये माझे दोनच नाही तर अनेक समर्थक आमदार, पण..., एकनाथ खडसेंनी खरं खरं सांगितलं!