वृत्तसंस्था, कोलंबो
या कार्यक्रमाला श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपला सिरीसेना, पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्यासह जगभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीलंका आणि भारत यांच्यातील संबंध महत्त्वाच्या टप्प्यावर असून, श्रीलंकेसाठी भारताकडून सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. कोलंबो ते वाराणसी अशी ‘एअर इंडिया’ची विमानसेवा ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा मोदी यांनी या वेळी केली. भारताकडून श्रीलंकेला हाती बनविलेल्या १६ हजार भारतीय मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. भारताच्या मदतीने डिकोया या तामिळबहुल भागात बांधण्यात आलेल्या सुपर-स्पेशालिटी
रुग्णालयाचे मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
‘तुमच्या आणि माझ्यामध्ये एक गोष्ट कायम आहे. माझेही चहाशी विशेष नाते आहे,’ असे सांगून मोदींनी श्रीलंकेतील मध्य प्रांतातील तमिळ भाषिक समुदायाशी संवाद साधला. ‘चाय पे चर्चा’सारख्या कार्यक्रमातून किंवा चहावेळी होणाऱ्या संवादांतून चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक कामगारांविषयी आदर आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्रीलंकेमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी आणि आर्थिक बदलाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यासाठी आम्ही तयार आहोत. भारतातील विकासाची फळे सर्व शेजारी देशांना, विशेषत: श्रीलंकेलाही मिळू शकतात.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
या कार्यक्रमाला श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपला सिरीसेना, पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्यासह जगभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीलंका आणि भारत यांच्यातील संबंध महत्त्वाच्या टप्प्यावर असून, श्रीलंकेसाठी भारताकडून सर्व ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. कोलंबो ते वाराणसी अशी ‘एअर इंडिया’ची विमानसेवा ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा मोदी यांनी या वेळी केली. भारताकडून श्रीलंकेला हाती बनविलेल्या १६ हजार भारतीय मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. भारताच्या मदतीने डिकोया या तामिळबहुल भागात बांधण्यात आलेल्या सुपर-स्पेशालिटी
रुग्णालयाचे मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
‘तुमच्या आणि माझ्यामध्ये एक गोष्ट कायम आहे. माझेही चहाशी विशेष नाते आहे,’ असे सांगून मोदींनी श्रीलंकेतील मध्य प्रांतातील तमिळ भाषिक समुदायाशी संवाद साधला. ‘चाय पे चर्चा’सारख्या कार्यक्रमातून किंवा चहावेळी होणाऱ्या संवादांतून चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक कामगारांविषयी आदर आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्रीलंकेमध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी आणि आर्थिक बदलाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यासाठी आम्ही तयार आहोत. भारतातील विकासाची फळे सर्व शेजारी देशांना, विशेषत: श्रीलंकेलाही मिळू शकतात.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान