वृत्तसंस्था, बीजिंग
ब्रह्मपुत्रा नदीवरील जलविद्युत प्रकल्पांची माहिती देण्यास चीनने नकार दिला आहे. तिबेटमधील माहिती संकलन केंद्राचे आधुनिकीकरण सुरू असल्याने ही माहिती देता येत नसल्याचे कारण चीनने दिले आहे. त्याशिवाय भारतीय यात्रेकरूंना कैलास आणि मानससरोवरला जाण्यासाठी सिक्कीममधील नथु ला खिंडीतील रस्ता खुला करण्याबाबत भारतासोबत चर्चा करण्याची तयारी आहे, असेही चीनने म्हटले आहे.
सीमाभागातील डोकलाम येथे भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने नथु ला खिंडीचा रस्ता बंद केला आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने अनेक प्रकल्प उभारले आहेत. त्याची माहिती भारताला देण्यात आलेली नाही. ‘दीर्घ काळापासून आम्ही नदीच्या माहितीबाबत भारतासोबत सहकार्य केले आहे. मात्र, चीनच्या बाजूंकडील माहिती संकलन केंद्राच्या आधुनिकीकरण आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही नदीसंदर्भातील आकडेवारी गोळा करू शकत नाही,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी पत्रकारांना सांगितले. जलविद्युत प्रकल्पांबाबतची माहिती देऊ शकत नसल्याबद्दल भारताला कळविण्यात आले आहे, या प्रश्नावर, भारताला त्याची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रविशकुमार यांनी भारत आणि चीनमध्ये २००६पासून तज्ज्ञांच्या पातळीवर यंत्रणा कार्यान्वित असल्याचे १८ ऑगस्टला सांगितले होते. दोन्ही देशांत दोन सामंजस्य करारही झाले आहेत. त्यानुसार १५ मे ते १५ जून या पुराच्या हंगामात चीनने सतलज आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांवरील जलविद्युत प्रकल्पांची माहिती देणे अपेक्षित आहे. या वर्षी चीनकडून जलविद्युत प्रकल्पांची माहिती चीनकडून मिळाली नसल्याचे कुमार यांनी सांगितले होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला चीनचे भौगोलिक स्थान आहे. त्यामुळे चीनने भारत आणि बांगलादेश या नदीच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूच्या देशांना ही माहिती देणे गरजेचे आहे. या आधारे प्रवाहाचा अंदाज घेऊन मान्सूनच्या काळात भारत आणि बांगलादेशला पुराच्या काळात नियोजन करणे शक्य होते.
ब्रह्मपुत्रा नदीवरील जलविद्युत प्रकल्पांची माहिती देण्यास चीनने नकार दिला आहे. तिबेटमधील माहिती संकलन केंद्राचे आधुनिकीकरण सुरू असल्याने ही माहिती देता येत नसल्याचे कारण चीनने दिले आहे. त्याशिवाय भारतीय यात्रेकरूंना कैलास आणि मानससरोवरला जाण्यासाठी सिक्कीममधील नथु ला खिंडीतील रस्ता खुला करण्याबाबत भारतासोबत चर्चा करण्याची तयारी आहे, असेही चीनने म्हटले आहे.
सीमाभागातील डोकलाम येथे भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने नथु ला खिंडीचा रस्ता बंद केला आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने अनेक प्रकल्प उभारले आहेत. त्याची माहिती भारताला देण्यात आलेली नाही. ‘दीर्घ काळापासून आम्ही नदीच्या माहितीबाबत भारतासोबत सहकार्य केले आहे. मात्र, चीनच्या बाजूंकडील माहिती संकलन केंद्राच्या आधुनिकीकरण आणि नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही नदीसंदर्भातील आकडेवारी गोळा करू शकत नाही,’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी पत्रकारांना सांगितले. जलविद्युत प्रकल्पांबाबतची माहिती देऊ शकत नसल्याबद्दल भारताला कळविण्यात आले आहे, या प्रश्नावर, भारताला त्याची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रविशकुमार यांनी भारत आणि चीनमध्ये २००६पासून तज्ज्ञांच्या पातळीवर यंत्रणा कार्यान्वित असल्याचे १८ ऑगस्टला सांगितले होते. दोन्ही देशांत दोन सामंजस्य करारही झाले आहेत. त्यानुसार १५ मे ते १५ जून या पुराच्या हंगामात चीनने सतलज आणि ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांवरील जलविद्युत प्रकल्पांची माहिती देणे अपेक्षित आहे. या वर्षी चीनकडून जलविद्युत प्रकल्पांची माहिती चीनकडून मिळाली नसल्याचे कुमार यांनी सांगितले होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहाच्या वरच्या बाजूला चीनचे भौगोलिक स्थान आहे. त्यामुळे चीनने भारत आणि बांगलादेश या नदीच्या प्रवाहाच्या खालच्या बाजूच्या देशांना ही माहिती देणे गरजेचे आहे. या आधारे प्रवाहाचा अंदाज घेऊन मान्सूनच्या काळात भारत आणि बांगलादेशला पुराच्या काळात नियोजन करणे शक्य होते.