अ‍ॅपशहर

'त्या' पुलामुळे चीन चिडला; भारताला इशारा

अरुणाचल प्रदेशातील पायभूत सुविधांवरून चीनने भारताला इशारा दिला आहे. 'अरुणाचलमधील पायभूत सुविधांबाबत संयम आणि सावधानता बाळगावी', असं चीनने भारताला सांगितलं आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या ढोला-सदिया या पुलाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Maharashtra Times 29 May 2017, 10:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पेइचिंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम china warns india over dhola sadiya bridge in arunachal pradesh
'त्या' पुलामुळे चीन चिडला; भारताला इशारा


अरुणाचल प्रदेशातील पायभूत सुविधांवरून चीनने भारताला इशारा दिला आहे. 'अरुणाचलमधील पायभूत सुविधांबाबत संयम आणि सावधानता बाळगावी', असं चीनने भारताला सांगितलं आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या ढोला-सदिया या पुलाचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या पार्श्वभूमीवर चीनने भारताला हा इशारा दिला आहे.

'अरुणाचलमधील सीमा प्रश्न सुटण्यापूर्वी भारताने संयम आणि सावधानता बाळगावी. भारताच्या पूर्वोत्तर भागाबाबत चीनची भूमिका स्पष्ट आहे', असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रह्मपुत्र नदीवरील देशातील सर्वात लांब पुलाचे लोकार्पण केले. दिवंगत गायक भूपेन हजारीका यांचं नाव या पुलाला देण्यात आलं आहे. या पुलामुळे आसामचा पूर्व भाग अरुणाचलशी जोडला गेला आहे. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचलमधील १६५ किलोमीटरचे अंतर कमी झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज