इस्लामाबाद : इम्रान खान यांचं सरकार कोसळल्यानंतर शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. इम्रान खान (Imran Khan News) यांच्याविरोधात परकीय शक्तींनी कारस्थान रचल्याचा आरोप करत त्यांचे लाखो समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. पुन्हा इम्रान खान यांनाच पंतप्रधान केलं जावं, अशी मागणी या नागरिकांकडून केली जात आहे. अशातच काही ठिकाणी जमावाने 'चौकीदार चोर है' अशी घोषणाबाजीही केल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तानातील रावळपिंडी भागात इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे खासदार शेख राशीद हे सभेला संबोधित करत होते. याच सभेत लोकांनी 'चौकीदार चोर है' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणांचा रोख पाकिस्तानी लष्कराप्रमुखांकडे असल्याचं सांगितलं जात आहे. नागरिकांनी लष्कराविरोधात रोष व्यक्त करण्यास सुरुवात केल्यानंतर खासदार शेख राशीद यांनी जमावाला शांत होण्याचं आवाहन केल्यानंतर ही घोषणाबाजी बंद झाली.
इम्रान खान सरकार पाडण्यात लष्करप्रमुखांचा हात?
मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने इम्रान खान यांचं सरकार अल्पमतात आलं आणि विरोधकांनी नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला उपसभापतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला, मात्र नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. यावेळी या प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडल्याने इम्रान खान यांची पंतप्रधानपदाची खुर्ची गेली. या सगळ्या घटनाक्रमामागे लष्करप्रमुख बाजवा यांचा हात असल्याचा आरोप इम्रान समर्थक करत असून या पार्श्वभूमीवर रावळपिंडी येथील सभेत त्यांच्याविरोधात घोषाबाजी झाल्याचं सागंण्यात येत आहे.
दरम्यान, इम्रान खान यांच्या समर्थकांकडून इस्लामाबाद, कराची, पेशावर, मालाकंद, मुल्तान, खेबर, झांग आणि क्वेटासह इतर शहरांमध्येही विरोधी पक्षाविरोधात आंदोलन केलं जात आहे.
इम्रान खान सरकार पाडण्यात लष्करप्रमुखांचा हात?
मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने इम्रान खान यांचं सरकार अल्पमतात आलं आणि विरोधकांनी नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला उपसभापतींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला, मात्र नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. यावेळी या प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडल्याने इम्रान खान यांची पंतप्रधानपदाची खुर्ची गेली. या सगळ्या घटनाक्रमामागे लष्करप्रमुख बाजवा यांचा हात असल्याचा आरोप इम्रान समर्थक करत असून या पार्श्वभूमीवर रावळपिंडी येथील सभेत त्यांच्याविरोधात घोषाबाजी झाल्याचं सागंण्यात येत आहे.
दरम्यान, इम्रान खान यांच्या समर्थकांकडून इस्लामाबाद, कराची, पेशावर, मालाकंद, मुल्तान, खेबर, झांग आणि क्वेटासह इतर शहरांमध्येही विरोधी पक्षाविरोधात आंदोलन केलं जात आहे.