अ‍ॅपशहर

‘चर्चेतूनच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न’

‘भारतीय उपखंडात शांतता निर्माण करण्यासाठी काश्मीरसह सर्व प्रश्नांवर पाकिस्तानला भारताशी चर्चा करून सोडवायचे आहेत,’ असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र विषयाचे सल्लागार सरताज अझीझ यांनी व्यक्त केले आहे.

Maharashtra Times 11 Jul 2017, 5:50 am
इस्लामाबाद : ‘भारतीय उपखंडात शांतता निर्माण करण्यासाठी काश्मीरसह सर्व प्रश्नांवर पाकिस्तानला भारताशी चर्चा करून सोडवायचे आहेत,’ असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र विषयाचे सल्लागार सरताज अझीझ यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dialogue will continue for solution
‘चर्चेतूनच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न’


‘द न्यूज इंटरनॅशनल’ या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सीमारेषेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अझीझ यांनी हे वक्तव्य केले आहे. काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, त्यापासून लक्ष हटवण्यासाठी भारत सीमेवर हल्ले करून तणाव वाढवत असल्याचा कांगावाही अझीझ यांनी केला. भारताने गेल्या वर्षात ४५० वेळा शस्रसंधीचे उल्लंघन केले असून, अनेक निरपराध नागरिकांचा बळी घेतला आहे, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, ‘भारतापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत काश्मीरमधील नागरिकांना पाकिस्तान राजकीय मदत करत राहील. इटली, ब्रिटनमध्ये जसे सार्वमत आजमावले जाते तसे काश्मीरात का नाही,’ असा सवालही अझिझ यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज