अ‍ॅपशहर

गोरखांनो भारतासाठी चीनविरोधात लढू नका, नेपाळमधील राजकीय पक्षाची कुरघोडी

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर भारतीय लष्कराने सीमेवर जवानांची संख्या वाढवली आहे. जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना ड्युटी जॉइन करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय लष्करातील गोरखा जवानांनाही ड्युटी जॉइन करण्यास सांगण्यात आलंय. यावरून नेपाळमधील पक्षाने पत्रक प्रसिद्ध करून नेपाळ सरकारने त्यांना रोखावं, अशी मागणी केलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jun 2020, 2:35 am
काठमांडूः चीनच्या इशाऱ्यावर चालत असलेल्या नेपाळने आता गोरखा नागरिकांना चुचकारण्या प्रयत्न सुरू केला आहे. नेपाळी भारतीय लष्करात जाऊ नये, अशी मागणी नेपाळमध्ये जोर धरते आहे. गोरखा नागरिकांनी भारताच्या बाजूने चीनविरोधात लढाई लढू नये, अशी मागणी नेपाळमधील एका बंदी घालण्यात आलेल्या पक्षाने केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम गोरखा रेजिमेंट (File Photo)


गोरखांना परत बोलावलं

बंदी असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या नेत्र विक्रम चंद यांनी काठमांडूमध्ये नेतृत्वाला आवाहन केलं आहे. गोरखा नागरिकांना भारतीय लष्करात जाण्यापासून रोखा, अशी मागणी त्यांनी केलीय. या संदर्भात पक्षाने पत्रकही जाहीर केलंय. गलवान खोऱ्यात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीनमधील तणाव वाढला आहे. यामुळे गोरखा रेजिमेंटमधील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना भारतीय लष्कराने ड्युटी जॉइन करण्यास सांगितलं आहे. म्हणजे भारत नेपाळी नागरिकांना चीनविरोधी लढाईत उतरवणार आहे, असं या पत्रकात म्हटलं गेलंय.

भारत-चीन तणाव निवळण्यासाठी 'या' देशाच्या पडद्याआडून हालचाली!

नेपाळच्या परराष्ट्र धोरणाविरोधात

गोरखा जवानांना भारताने तैनात करणं हे नेपाळच्या परराष्ट्र धोरणाविरोधात आहे. नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे. एका देशाच्या सैन्यात काम करणाऱ्या जवानाचा वापर दुसऱ्या देशाविरोधात करायला नको, असं पक्षाने म्हटलं आहे.

चीनच्या मनात आहे तरी काय?; आता जपानसोबत वाद, युद्धाची भीती

गोरखा जवानांचे महत्त्व

भारतीय लष्करात गोरखा जवानांचे मोठे महत्त्व आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागात बहुतेककरून गोरखा जवान तैनात असतात. डोंगराळ भागात त्यांच्यापेक्षा उत्तम कुणी लढू शकत नाही. भारतच नाही तर ब्रिटननेही गोरखांचा सैन्यात समावेश केला होता. अलिकडेच तीन नेपाळी नागरिकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयएमएने कमिशन केले. दरम्यान, नेपाळ सीमा रस्त्यावरून भारतात येत असलेल्या गोरखा जवानांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना पुढील पाठवण्यात आलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज