मटा ऑनलाइन वृत्त। वॉशिंग्टन
'एच १ बी' व्हिसाच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण होऊ शकतो असे मत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या माजी मंत्री आणि ज्येष्ठ राजकीय नेत्या निशा देसाई बिस्वाल यांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा हजारो भारतीयांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. या प्रकरणी ट्रम्प सरकारने मोठ्या समंजसपणे आणि विवेकशीलतेने निर्णय घ्यावा असे आवाहनही देसाई बिस्वाल यांनी ट्रम्प शासनाला केले आहे.
निशा देसाई बिस्वाल या अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकालात दक्षिण आणि मध्य आशियाच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री होत्या. मागील शासनांप्रमाणेच हे शासन देखील भारत-अमेरिकेच्या मजबूत संबंधांचे महत्त्व जाणते आणि मानते देखील. या शासनाने या प्रकरणाकडे नफा-तोट्याच्या दृष्टीने पाहू नये असे आवाहनही बिस्वाल यांनी केले आहे.
एच १ बी कार्यक्रम अमेरिका आणि परदेशी कंपन्यासाठी महत्त्वाचा आहे. याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला आहे. परंतु या कार्यक्रमाचा गैरवापर होता कामा नये असेही बिस्वाल म्हणाल्या.
बिस्वाल पुढे म्हणाल्या, 'जर जगभरातून सर्वोत्तम आणि तल्ल्ख बुद्धीच्या व्यक्ती अमेरिकेत आल्या नाहीत तर याचा विपरित परिणाम होईल. इतर देशांमधून येत परदेशी लोक आमच्या नोकऱ्या घेत आहेत हेही खरे आहे. हिंसा आणि हेट क्राइमच्या घटना वाढत आहेत. या समस्येवर योग्य तो तोडगा काढण्याची गरज आहे.'
ओबामा प्रशासनांतर्गत दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांमध्ये चांगल्या सुधारणा झाल्या. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या संबंधात विशेष सुधारणा झाल्या असेही बिस्वाल म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, ' मला वाटते की, दोन्ही देशांकडून बरेच काही करण्याची गरज आहे. भारताची क्षमता लक्षात घेता अमेरिकेने भारतात गुंतवणूक करण्याबाबतची बांधिलकी मानली पाहिजे. शिवाय भारताकडून देखील पुरक प्रयत्न केले गेले पाहिजेत.'
'एच १ बी' व्हिसाच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण होऊ शकतो असे मत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या माजी मंत्री आणि ज्येष्ठ राजकीय नेत्या निशा देसाई बिस्वाल यांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा हजारो भारतीयांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे. या प्रकरणी ट्रम्प सरकारने मोठ्या समंजसपणे आणि विवेकशीलतेने निर्णय घ्यावा असे आवाहनही देसाई बिस्वाल यांनी ट्रम्प शासनाला केले आहे.
निशा देसाई बिस्वाल या अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकालात दक्षिण आणि मध्य आशियाच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री होत्या. मागील शासनांप्रमाणेच हे शासन देखील भारत-अमेरिकेच्या मजबूत संबंधांचे महत्त्व जाणते आणि मानते देखील. या शासनाने या प्रकरणाकडे नफा-तोट्याच्या दृष्टीने पाहू नये असे आवाहनही बिस्वाल यांनी केले आहे.
एच १ बी कार्यक्रम अमेरिका आणि परदेशी कंपन्यासाठी महत्त्वाचा आहे. याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला आहे. परंतु या कार्यक्रमाचा गैरवापर होता कामा नये असेही बिस्वाल म्हणाल्या.
बिस्वाल पुढे म्हणाल्या, 'जर जगभरातून सर्वोत्तम आणि तल्ल्ख बुद्धीच्या व्यक्ती अमेरिकेत आल्या नाहीत तर याचा विपरित परिणाम होईल. इतर देशांमधून येत परदेशी लोक आमच्या नोकऱ्या घेत आहेत हेही खरे आहे. हिंसा आणि हेट क्राइमच्या घटना वाढत आहेत. या समस्येवर योग्य तो तोडगा काढण्याची गरज आहे.'
ओबामा प्रशासनांतर्गत दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांमध्ये चांगल्या सुधारणा झाल्या. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या संबंधात विशेष सुधारणा झाल्या असेही बिस्वाल म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, ' मला वाटते की, दोन्ही देशांकडून बरेच काही करण्याची गरज आहे. भारताची क्षमता लक्षात घेता अमेरिकेने भारतात गुंतवणूक करण्याबाबतची बांधिलकी मानली पाहिजे. शिवाय भारताकडून देखील पुरक प्रयत्न केले गेले पाहिजेत.'