वृत्तसंस्था, लाहोर
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार जमात-उद-दावाचा म्होरक्या दहशतवादी हाफिज सईद आणि त्याच्या चार साथीदारांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने न्यायिक आढावा मंडळाला दिली. या सर्वांवर ‘जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवण्याचा’ आरोप ठेवण्यात आला आहे.
दहशतवादी हाफिज सईद याला शनिवारी न्यायिक आढावा मंडळासमोर हजर करण्यात आले. त्याला पाकिस्तान सरकारनेच ताब्यात घेतले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
काश्मिरींच्या बाजूने आवाज उठवल्यावरून आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा त्याने केला. मात्र, पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने त्याचा दावा फेटाळला आणि जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एजाझ अफझल खान लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आयेषा ए मलिक आणि बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे जमाल खान मंडोखैल यांचा या मंडळात समावेश आहे. सईदसमवेत जाफर इक्बाल, अब्दुल रहमान अबिद, अब्दुल्ला उबैद आणि काझी काशिफ नियाझ या दहशतवाद्यांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यासंबंधीच्या सर्व नोंदी सादर करण्याचे आदेश मंडळाने मंत्रालयाला दिले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आज, सोमवारी होणार आहे. यावेळी अॅटर्नी जनरल यांनी उपस्थित राहावे, असे निर्देश मंडळाने दिले आहेत. दरम्यान, सईदला कडक सुरक्षा व्यवस्थेत मंडळासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाबाहेर सईदचे अनेक साथीदार हजर होते. सईदचे वकील ए. के. डोगर यांनी दावा लढण्याची तयारी दाखवली होती. मात्र, सईदने स्वतःच दावा लढणार असल्याचे सांगितले.
सरकारने माझ्यावर केलेले आरोप अद्याप कोणीही सिद्ध करू शकलेले नाही. मी व माझ्या सहकाऱ्यांनी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आणि पाक सरकारच्या दुर्बल धोरणांविरोधात आवाज उठवला म्हणून आमचा बळी दिला जात आहे, असे फुत्कार सईदने टाकले. काश्मिरींच्या बाजूने आवाज उठवल्यामुळे आपल्याला स्थानबद्ध केल्याचा कांगावाही त्याने केला.
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार जमात-उद-दावाचा म्होरक्या दहशतवादी हाफिज सईद आणि त्याच्या चार साथीदारांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने न्यायिक आढावा मंडळाला दिली. या सर्वांवर ‘जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवण्याचा’ आरोप ठेवण्यात आला आहे.
दहशतवादी हाफिज सईद याला शनिवारी न्यायिक आढावा मंडळासमोर हजर करण्यात आले. त्याला पाकिस्तान सरकारनेच ताब्यात घेतले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
काश्मिरींच्या बाजूने आवाज उठवल्यावरून आपल्याला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा त्याने केला. मात्र, पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने त्याचा दावा फेटाळला आणि जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवला. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एजाझ अफझल खान लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आयेषा ए मलिक आणि बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे जमाल खान मंडोखैल यांचा या मंडळात समावेश आहे. सईदसमवेत जाफर इक्बाल, अब्दुल रहमान अबिद, अब्दुल्ला उबैद आणि काझी काशिफ नियाझ या दहशतवाद्यांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यासंबंधीच्या सर्व नोंदी सादर करण्याचे आदेश मंडळाने मंत्रालयाला दिले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आज, सोमवारी होणार आहे. यावेळी अॅटर्नी जनरल यांनी उपस्थित राहावे, असे निर्देश मंडळाने दिले आहेत. दरम्यान, सईदला कडक सुरक्षा व्यवस्थेत मंडळासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाबाहेर सईदचे अनेक साथीदार हजर होते. सईदचे वकील ए. के. डोगर यांनी दावा लढण्याची तयारी दाखवली होती. मात्र, सईदने स्वतःच दावा लढणार असल्याचे सांगितले.
सरकारने माझ्यावर केलेले आरोप अद्याप कोणीही सिद्ध करू शकलेले नाही. मी व माझ्या सहकाऱ्यांनी काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आणि पाक सरकारच्या दुर्बल धोरणांविरोधात आवाज उठवला म्हणून आमचा बळी दिला जात आहे, असे फुत्कार सईदने टाकले. काश्मिरींच्या बाजूने आवाज उठवल्यामुळे आपल्याला स्थानबद्ध केल्याचा कांगावाही त्याने केला.