वृत्तसंस्था, लंडन
भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त नवतेज सरना यांची उपस्थिती असलेल्या येथील एका कार्यक्रमात गुरुवारी भारतातील कर्जबुडवे व फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांनी हजेरी लावल्याने वाद निर्माण झाला असताना, ‘मी निमंत्रण असल्यानेच त्या कार्यक्रमास गेलो होतो, आयुष्यात कधी मी कुठल्याही कार्यक्रमात घुसखोरी केलेली नाही’, असा दावा मल्ल्या यांनी केला आहे.
थेट उच्चायुक्तांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात मल्ल्या अवतरल्याने केंद्र सरकारच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे, ‘या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मल्ल्या यांना निमंत्रण दिलेलेच नव्हते’, असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिले. मात्र रविवारी मल्ल्या यांनी ट्विट करून निमंत्रण असल्यानेच आपण कार्यक्रमास गेलो होतो, असा दावा केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मल्ल्या यांचे आगमन होताच सरना यांनी तातडीने व्यासपीठ सोडणे पसंत केले होते.
भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त नवतेज सरना यांची उपस्थिती असलेल्या येथील एका कार्यक्रमात गुरुवारी भारतातील कर्जबुडवे व फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांनी हजेरी लावल्याने वाद निर्माण झाला असताना, ‘मी निमंत्रण असल्यानेच त्या कार्यक्रमास गेलो होतो, आयुष्यात कधी मी कुठल्याही कार्यक्रमात घुसखोरी केलेली नाही’, असा दावा मल्ल्या यांनी केला आहे.
थेट उच्चायुक्तांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात मल्ल्या अवतरल्याने केंद्र सरकारच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे, ‘या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मल्ल्या यांना निमंत्रण दिलेलेच नव्हते’, असे स्पष्टीकरण परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी दिले. मात्र रविवारी मल्ल्या यांनी ट्विट करून निमंत्रण असल्यानेच आपण कार्यक्रमास गेलो होतो, असा दावा केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मल्ल्या यांचे आगमन होताच सरना यांनी तातडीने व्यासपीठ सोडणे पसंत केले होते.