वॉशिंग्टन: अमेरिकेत सक्रिय असलेली खलिस्तानी संघटना 'सिख फॉर जस्टिस' या संघटनेने भारताविरोधात आवाहन केले आहे. खलिस्तान दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या या संघटनेने १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले आहे. झेंडा फडकणाऱ्यांना एक लाख २५ हजार डॉलरचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. या घोषणेनंतर दिल्ली पोलीस अधिक सक्रिय झाली आहे.
सिख फॉर जस्टिस या संघटनेचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूनने सांगितले की, १५ ऑगस्ट हा शीख बांधवांचा स्वातंत्र्य दिन नाही. १९४७ मध्ये झालेल्या फाळणीमुळे शीख समुदायाला मोठ्या वेदनेतून जावे लागले होते. आमच्यासाठी परिस्थिती अद्याप बदलली नाही. फक्त राज्यकर्ते बदलले आहेत. भारतात आम्हाला हिंदू म्हणून गृहित धरले जाते आणि पंजाबच्या साधन संपत्तीचा वापर इतर राज्यांच्या विकासासाठी करण्यात येत असल्याचे त्याने म्हटले. हा आमच्यावरील अन्याय असून अन्य राज्यांचे हित पाहिले जात आहे. आम्हाला वास्तविक स्वातंत्र्याची आवश्यकता असल्याची मल्लिनाथीही त्याने केली आहे.
वाचा: कमला हॅरीस यांची काश्मीर भूमिका भारताला त्रासदायक?
वाचा: भारताने सीमा प्रश्न जटील करू नये; चीनच्या उलट्या बोंबा
खलिस्तानी दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणाऱ्या गुरपरवंत सिंग याच्याविरोधात मागील काही महिन्यांपासून कायद्याचा फास आवळला जात आहे. सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात सहा एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. करोना संकटाच्या काळात राजकीय जनमत करण्याची मागणी त्याच्याकडून करण्यात येत आहे. त्याशिवाय फोन, ई-मेल द्वारे शीख समुदायासाठी वेगळ्या राज्याची मागणी करण्यात येत आहे.
वाचा: शी जिनपिंग पाकिस्तान दौऱ्यावर जाणार; भारताची चिंता वाढणार!
गुरपरवंत सिंगने केलेल्या दाव्यानुसार, त्याची ही मागणी मानवाधिकारांच्या जागतिक जाहीरनाम्यानुसार योग्य आहे. लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकवण्याच्या त्याच्या घोषणेनंतर आता दिल्ली पोलीस व सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ई-मेलची तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय त्याने दिलेल्या धमकीविरोधात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या संघटनेच्यावतीने मागील महिन्यात जनमत घेण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, इटली, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या भारतीय दूतावासाबाहेर नोंदणी शिबिर घेण्याची घोषणा करण्यात आली होती. भारताने या संघटनेवर २०१९ मध्ये बंदी घातली आहे.
सिख फॉर जस्टिस या संघटनेचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूनने सांगितले की, १५ ऑगस्ट हा शीख बांधवांचा स्वातंत्र्य दिन नाही. १९४७ मध्ये झालेल्या फाळणीमुळे शीख समुदायाला मोठ्या वेदनेतून जावे लागले होते. आमच्यासाठी परिस्थिती अद्याप बदलली नाही. फक्त राज्यकर्ते बदलले आहेत. भारतात आम्हाला हिंदू म्हणून गृहित धरले जाते आणि पंजाबच्या साधन संपत्तीचा वापर इतर राज्यांच्या विकासासाठी करण्यात येत असल्याचे त्याने म्हटले. हा आमच्यावरील अन्याय असून अन्य राज्यांचे हित पाहिले जात आहे. आम्हाला वास्तविक स्वातंत्र्याची आवश्यकता असल्याची मल्लिनाथीही त्याने केली आहे.
वाचा: कमला हॅरीस यांची काश्मीर भूमिका भारताला त्रासदायक?
वाचा: भारताने सीमा प्रश्न जटील करू नये; चीनच्या उलट्या बोंबा
खलिस्तानी दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणाऱ्या गुरपरवंत सिंग याच्याविरोधात मागील काही महिन्यांपासून कायद्याचा फास आवळला जात आहे. सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात सहा एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. करोना संकटाच्या काळात राजकीय जनमत करण्याची मागणी त्याच्याकडून करण्यात येत आहे. त्याशिवाय फोन, ई-मेल द्वारे शीख समुदायासाठी वेगळ्या राज्याची मागणी करण्यात येत आहे.
वाचा: शी जिनपिंग पाकिस्तान दौऱ्यावर जाणार; भारताची चिंता वाढणार!
गुरपरवंत सिंगने केलेल्या दाव्यानुसार, त्याची ही मागणी मानवाधिकारांच्या जागतिक जाहीरनाम्यानुसार योग्य आहे. लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकवण्याच्या त्याच्या घोषणेनंतर आता दिल्ली पोलीस व सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ई-मेलची तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय त्याने दिलेल्या धमकीविरोधात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. या संघटनेच्यावतीने मागील महिन्यात जनमत घेण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, इटली, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या भारतीय दूतावासाबाहेर नोंदणी शिबिर घेण्याची घोषणा करण्यात आली होती. भारताने या संघटनेवर २०१९ मध्ये बंदी घातली आहे.