न्यूयॉर्क
संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत भारताचा क्रमांक घसरून तो १४० व्या स्थानी पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत सात पायऱ्या खाली सरकला आहे. यादीत भारत पाकिस्तानच्या मागे असल्याचे दिसत आहे. यादीत पाकिस्तान ६७व्या स्थानी आहे. दरम्यान, फिनलँड देशाने याही वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. संयुक्त राष्ट्राने बुधवारी आनंदी राष्ट्रांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला.
संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये २० मार्च हा जागतिक आनंद दिन घोषित केला. संयुक्त राष्ट्राची या संदर्भातील यादी ६ गोष्टींवर आधारित असते. यात उत्पन्न, आरोग्यदायी जीवन, सामाजिक स्थिती, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता यांचा समावेश आहे. या अहवालानुसार गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात आनंदी असण्याच्या प्रमाणात घट झालेली आहे. भारतात तर हा स्तर सतत खालावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
भारत सन २०१८ मध्ये आनंदी असण्यात १३३व्या स्थानावर होता. यावर्षी मात्र तो १४० व्या स्थानी आहे. जगातील नागरिक स्वत:ला किती आनंदी समजतात यावर आधारित जगभरातील १५६ देशांचा या पाहणीत समावेश करण्यात आला. जगातील अनेक देशांमध्ये चिंता, नैराश्य आणि क्रोधासह नकारात्मक दृष्टीकोन अशा भावनांमध्येही वृद्धी झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आनंदी राष्ट्रांच्या यादीत फिनलँडनंतर दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे, चौथ्या क्रमांकावर आइसलँड आणि पाचव्या क्रमांकावर नेदरलँड देशांचा समावेश आहे. अहवालानुसार, पाकिस्तान ६७व्या, बांगलादेश १२५व्या आणि चीन ९३व्या स्थानी आहे.
युद्धग्रस्त दक्षिण सुदान देशाचे नागरिक सर्वाधिक दु:खी आहेत. त्यानंतर दु:खी राष्ट्रांमध्ये मध्य आफ्रिकी गणराज्य (१५५), अफगाणिस्तान (१५४), टांझानिया (१५३), आणि रवांडा (१५२) या देशांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश असूनही अमेरिका आनंदी राष्ट्रांच्या यादीत १९व्या स्थानी आहे.
संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत भारताचा क्रमांक घसरून तो १४० व्या स्थानी पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत सात पायऱ्या खाली सरकला आहे. यादीत भारत पाकिस्तानच्या मागे असल्याचे दिसत आहे. यादीत पाकिस्तान ६७व्या स्थानी आहे. दरम्यान, फिनलँड देशाने याही वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. संयुक्त राष्ट्राने बुधवारी आनंदी राष्ट्रांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला.
संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये २० मार्च हा जागतिक आनंद दिन घोषित केला. संयुक्त राष्ट्राची या संदर्भातील यादी ६ गोष्टींवर आधारित असते. यात उत्पन्न, आरोग्यदायी जीवन, सामाजिक स्थिती, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता यांचा समावेश आहे. या अहवालानुसार गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात आनंदी असण्याच्या प्रमाणात घट झालेली आहे. भारतात तर हा स्तर सतत खालावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
भारत सन २०१८ मध्ये आनंदी असण्यात १३३व्या स्थानावर होता. यावर्षी मात्र तो १४० व्या स्थानी आहे. जगातील नागरिक स्वत:ला किती आनंदी समजतात यावर आधारित जगभरातील १५६ देशांचा या पाहणीत समावेश करण्यात आला. जगातील अनेक देशांमध्ये चिंता, नैराश्य आणि क्रोधासह नकारात्मक दृष्टीकोन अशा भावनांमध्येही वृद्धी झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आनंदी राष्ट्रांच्या यादीत फिनलँडनंतर दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावर नॉर्वे, चौथ्या क्रमांकावर आइसलँड आणि पाचव्या क्रमांकावर नेदरलँड देशांचा समावेश आहे. अहवालानुसार, पाकिस्तान ६७व्या, बांगलादेश १२५व्या आणि चीन ९३व्या स्थानी आहे.
युद्धग्रस्त दक्षिण सुदान देशाचे नागरिक सर्वाधिक दु:खी आहेत. त्यानंतर दु:खी राष्ट्रांमध्ये मध्य आफ्रिकी गणराज्य (१५५), अफगाणिस्तान (१५४), टांझानिया (१५३), आणि रवांडा (१५२) या देशांचा समावेश आहे. जगातील सर्वात श्रीमंत देश असूनही अमेरिका आनंदी राष्ट्रांच्या यादीत १९व्या स्थानी आहे.