नवी दिल्ली : भारत एक महत्त्वाचा देश आहे. म्हणून आखाती देशांमधील तणाव कमी करण्यात भारताला महत्त्वाची भूमिका बजावता येऊ शकते, अशी अपेक्षा इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांनी व्यक्त केली. इराणचे मेजर जनरल कासिम सुलेमानीची अमेरिकेकडून हत्या करण्यात आल्यापासून मध्य पूर्वमध्ये तणाव आहे. त्या पार्श्वभूमीवर जरीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली. लवकरात लवकर तणाव कमी व्हावा हीच भूमिका भारतानेही घेतली आहे. भारत सध्या इराण, संयुक्त अरब अमिरात, ओमान आणि कतरसह इतर प्रमुख देशांच्या सतत संपर्कात आहे. कारण, या क्षेत्रात भारताचेही हितसंबंध जोडलेले आहेत.
इराण-अमेरिका संघर्ष निवळणार
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांना लक्ष्य केलं. याच कारवाई दरम्यान, गेल्या आठवड्यात इराणच्या क्षेपणास्त्रामुळे तेहरानवरूनच उड्डाण केलेले युक्रेनचे प्रवासी विमानही कोसळले. या घटनेत विमानातील १७६ जणांचा मृत्यू झाला होता. आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर इराणने या प्रकरणी पहिली अटकही केली आहे.
विमान पाडल्याप्रकरणी इराणमध्ये अटक
अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादून इराणची अर्थव्यवस्था संकटात आणली आहे. भारतासारख्या महत्त्वाच्या देशांनीही इराणकडून तेल आयात बंद केली. यानंतर आता वाढलेल्या तणावामुळे आखाती देशांमध्ये तणाव वाढत आहे. एक जबाबदार देश म्हणून इराणनेही भारताकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. पण अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात अजूनपणे कुणीही थेट उडी घेतलेली नाही.
युक्रेनचे विमान इराणनेच पाडले
दरम्यान, जरीफ यांनी बुधवारी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये मध्य पूर्वमधील परिस्थितीवर विस्तृत चर्चा झाल्याची माहिती आहे. जरीफ आणि सर्गेई दोघेही भारतात होत असलेलं जागतिक संमेलन ‘रायसाना डायलॉग’साठी पाहुणे म्हणून आलेले आहेत. या संमेलनाच्या वेळेला अत्यंत महत्त्व आहे. कारण, संपूर्ण जगाचं लक्ष इराण आणि अमेरिका संघर्षावर असताना भारतात ही महत्त्वाची बैठक होत आहे.
इराण-अमेरिका संघर्ष निवळणार
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळांना लक्ष्य केलं. याच कारवाई दरम्यान, गेल्या आठवड्यात इराणच्या क्षेपणास्त्रामुळे तेहरानवरूनच उड्डाण केलेले युक्रेनचे प्रवासी विमानही कोसळले. या घटनेत विमानातील १७६ जणांचा मृत्यू झाला होता. आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर इराणने या प्रकरणी पहिली अटकही केली आहे.
विमान पाडल्याप्रकरणी इराणमध्ये अटक
अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादून इराणची अर्थव्यवस्था संकटात आणली आहे. भारतासारख्या महत्त्वाच्या देशांनीही इराणकडून तेल आयात बंद केली. यानंतर आता वाढलेल्या तणावामुळे आखाती देशांमध्ये तणाव वाढत आहे. एक जबाबदार देश म्हणून इराणनेही भारताकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. पण अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात अजूनपणे कुणीही थेट उडी घेतलेली नाही.
युक्रेनचे विमान इराणनेच पाडले
दरम्यान, जरीफ यांनी बुधवारी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये मध्य पूर्वमधील परिस्थितीवर विस्तृत चर्चा झाल्याची माहिती आहे. जरीफ आणि सर्गेई दोघेही भारतात होत असलेलं जागतिक संमेलन ‘रायसाना डायलॉग’साठी पाहुणे म्हणून आलेले आहेत. या संमेलनाच्या वेळेला अत्यंत महत्त्व आहे. कारण, संपूर्ण जगाचं लक्ष इराण आणि अमेरिका संघर्षावर असताना भारतात ही महत्त्वाची बैठक होत आहे.