अ‍ॅपशहर

india china news : भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा; LAC वर एकतर्फी बदल स्वीकार्य नाही, भारताने सुनावले

लडाखमध्ये तणाव असताना भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये तजाकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये बैठक झाली. जवळपास १ तास ही बैठक चालली. सीमेवरील तणावावर चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2021, 8:01 am
दुशांबेः पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षभरापासून भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) तणाव आहे. अशातच आता भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये तजाकिस्तानची राजधानी दुशांबेमध्ये द्वीपक्षीय बैठक ( india china foreign minister talks in dushanbe ) झाली. काही दिवसांपूर्वीच चिनी सैनिकांनी लडाखच्या डेमचोकमध्ये घुसखोरी करून बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या वाढदिवसाचा ( lac standoff ) निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात लडाखमधील तणावावर चर्चा झाली. ही बैठक एक तास चालली. या बैठकीत दोन्ही देशांनी लष्कराच्या कमांडर्सची लवकरात लवकर बैठक बोलवण्यास सहमती दर्शवली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india china talks
भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा; LAC वर एकतर्फी बदल स्वीकार्य नाही, भारताने सुनावले


लडाखच्या पश्चिम भागात एलएसीवरील तणावाचा मुद्दा हा चर्चेच्या केंद्रस्थानी होता, असं परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करून सांगितलं. तसंच एलएसीवरील जैसे थे स्थिती एकतर्फी बदल स्वाकारला जाणार नाही. भारत-चीनमधील संबंध दृढ होण्यासाठी सीमेवरील शांतता आणि शांतता कायम ठेवणं अत्यावश्यक आहे, असं आपण चीनच्या वांग यी यांना सांगितल्याचं जयशंकर म्हणाले.


भारत-चीन सीमेवर गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर सीमेवर तणावाची स्थिती कायम आहे. सीमेवरील सैनिक हटवण्यावर दोन्ही देशांमध्ये कूटनिती स्तरावर अनेकदा चर्चा झाली आहे. यानंतरही भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आहेत.

अभियंत्यांच्या हत्येने पाकिस्तानवर चीन संतापला; केली 'ही' मागणी

पूर्व लडाखमध्ये ५ मे २०२० पासून भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव आहे. या घटनेनंतर १५ जूनला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात ४५ वर्षानंतर रक्तरंजिक संघर्ष झाला. या घटनेनंतर दोन्ही देश सैनिक हटवण्यावर चर्चा करत आहेत. हॉस स्प्रिंग, गोगरा आणि डेपसांगमधून चीनने सानिक हटवावेत, अशी भारताची मागणी आहे.

पाकिस्तान: बसमध्ये भीषण स्फोट; ४ चिनी अभियंत्यांसह आठ जण ठार, अनेक जखमी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज