अ‍ॅपशहर

India China tension लडाख तणाव: भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये आज रशियात बैठक

मागील काही दिवसांपासून लडाखमध्ये भारत-चीन दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Sep 2020, 4:41 pm
मॉस्को: लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यादरम्यान मॉस्को आज बैठक होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही भेट होणार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मंगळवारीच रशियात दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India China meeting in Russia
लडाख तणाव: भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये आज बैठक


रशियात शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन ची बैठक रशियात होणार आहे. त्यापूर्वी या बैठका पार पडत आहेत. याआधी काही दिवस आधीच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीतून फार निष्पन्न झाले नसल्याची चर्चा आहे.

भारत-चीन दरम्यान तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूचे सैन्य आमने सामने उभे ठाकले आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत लडाख पूर्व भागातील तणाव कमी करणे आणि सैन्य माघारीवर चर्चा अपेक्षित आहे. त्यामुळेच बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनमधील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक १० सप्टेंबर रोजी मॉस्कोमध्ये होणार आहे.

वाचा: LACवर गोळीबार; बिथरलेल्या चीनकडून भारताला धमकी

भारत-चीन वादात रशियाची मध्यस्थी?

भारत आणि चीन दरम्यानचे मतभेद दूर होऊम तणाव निवळला पाहिजे अशी भूमिका रशियाने व्यक्त केली आहे. मात्र, या देशांच्या वादात स्वत:हून मध्यस्थी करणार नसल्याचेही रशियाने स्पष्ट केले आहे. भारतातील रशियन दूतावासाचे उपप्रमुख रोम बबुश्किन यांनी सांगितले की, भारत आणि चीन दरम्यानचे मतभेद सोडवण्यासाठी रशिया प्रयत्न करेल. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये कोणत्याही द्विपक्षीय वादाचा समावेश करण्यात आला नाही. मात्र, सहभागी देशांमध्ये परस्परांमधील विश्वास आणि सहकार्य वाढवण्यासाठी एक योग्य मंच उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: युवक अपहरणाचे माहीत नाही, पण अरुणाचल आमचाच हिस्सा; चीनची मुजोरी

दरम्यान, लडाख पूर्व भागात पॅन्गाँग त्सो सरोवराजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा भागात गोळीबार झाल्याचे समोर आल्यानंतर बिथरलेल्या चीनने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. भारतासोबत आम्हाला युद्ध करायचे नाही. मात्र, चीनला घाबरवण्यासाठी गोळीबार होत असेल तर आम्ही युद्धापासून मागे हटणार नसल्याचे चीनने म्हटले आहे.

वाचा: पॅन्गाँग सरोवराजवळ संघर्ष: चीनने सैन्याची कुमक वाढवली, रणगाडे तैनात

तर, लडाखमध्ये सीमेवर भारताने गोळीबार केल्याचा चीनचा आरोप भारताने स्पष्टपणे फेटाळून लावला आहे. भारताकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आलेला नाही, असे भारताने निवेदनाद्वारे म्हटले आहे. भारताने कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नसून, सीमेवर शांतता राहावी असाच भारताचा प्रयत्न असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. ७ सप्टेंबरच्या रात्री पीएलएने भारतीय सैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी भारताने नाही, तर पीएलएनेच हवेत गोळीबार केला असा स्पष्ट आरोप भारताने चीनवर केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज