बीजिंग: लडाखमधील गलावान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्य माघारी घेण्यास चीनने सुरुवात केली आहे. एक ते दोन किमी अंतर चीन सैन्य मागे हटणार असून तात्पुरते तंबूदेखील हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत. त्यानंतर आता सैन्य माघारीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण होण्यासाठी काही पावले उचलण्यात आली आहे. त्यानुसारच सैन्य मागे घेण्याबाबत निर्णय झाला असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
तर, दुसरीकडे चीन सरकारच्या मालकीचे 'ग्लोबल टाइम्स'ने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी झाला असल्याचे म्हटले आहे. भारत आणि चीनचे सैन्यांनी फ्रंट बॉर्डरहून सैन्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये ३० जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हे सैन्य माघारी घेण्यात आले आहेत.
वाचा: पंतप्रधान मोदींची लडाख भेट; चीनचा जळफळाट!
कमांडर पातळीवरील बैठकीत दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे. भारताने चीनसोबत शांतेचे धोरण ठेवले पाहिजे आणि आपले सैन्य कमी करायला हवे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
वाचा: होय...टिकटॉक बंदीमुळे आर्थिक नुकसान; चीनची कबुली
वाचा: भारत-चीनवादात अमेरिका चिअरलीडर; चीनची बोचरी टीका
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवान भागात चीनच्या सैन्याने घुसखोरी केल्यानंतर भारतीय लष्कराने ताबडतोब हालचाली सुरू केल्या. चीनने जितक्या सैन्याची जमवाजमव केली, तेवढेच सैन्य भारतानेदेखील जमवले होते. त्याशिवाय, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी हवाई दलही सज्ज झाले होते. हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी युद्ध अभ्यास करण्यासही सुरुवात केली.
वाचा: नेपाळमध्ये चीनची लुडबुड; पंतप्रधान ओलींच्या बचावासाठी चीनचा हस्तक्षेप
वाचा: श्रीलंकेचे भारतविरोधी पाऊल? सरकारने दिले 'हे' आदेश
दरम्यान, ३० जूनला झालेल्या कोअर कमांडर स्तरावरील बैठकीमध्ये पडताळणीची प्रक्रिया देखील ठरवण्यात आली होती. यात एक पाऊल उचलल्यानंतरच पुरावे पाहून दुसरे पाऊल उचलले जाईल असे ठरवण्यात आले होते. या पडताळणीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शिवाय गस्ती पथक देखील प्रत्यक्षात पाहणी करेल. जेव्हा अशी पडताळणी होईल, तेव्हाच दुसरे पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती भारतीय लष्करातील अधिकाऱ्याने दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांच्या सैन्याने रिलोकेशनवर आपली सहमती दर्शवली आहे. अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी आता गलवान खोरे आता बफर झोन झाले आहे.
गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केली असल्याचे समोर आल्यानंतर तणाव वाढला होता. त्यातच १५ जून रोजी भारत-चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्याच्या परिणामी दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ झाली. तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आता पर्यंत दोन्ही देशांदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत. त्यानंतर आता सैन्य माघारीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण होण्यासाठी काही पावले उचलण्यात आली आहे. त्यानुसारच सैन्य मागे घेण्याबाबत निर्णय झाला असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
तर, दुसरीकडे चीन सरकारच्या मालकीचे 'ग्लोबल टाइम्स'ने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी झाला असल्याचे म्हटले आहे. भारत आणि चीनचे सैन्यांनी फ्रंट बॉर्डरहून सैन्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये ३० जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हे सैन्य माघारी घेण्यात आले आहेत.
वाचा: पंतप्रधान मोदींची लडाख भेट; चीनचा जळफळाट!
कमांडर पातळीवरील बैठकीत दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे. भारताने चीनसोबत शांतेचे धोरण ठेवले पाहिजे आणि आपले सैन्य कमी करायला हवे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
वाचा: होय...टिकटॉक बंदीमुळे आर्थिक नुकसान; चीनची कबुली
वाचा: भारत-चीनवादात अमेरिका चिअरलीडर; चीनची बोचरी टीका
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवान भागात चीनच्या सैन्याने घुसखोरी केल्यानंतर भारतीय लष्कराने ताबडतोब हालचाली सुरू केल्या. चीनने जितक्या सैन्याची जमवाजमव केली, तेवढेच सैन्य भारतानेदेखील जमवले होते. त्याशिवाय, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी हवाई दलही सज्ज झाले होते. हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी युद्ध अभ्यास करण्यासही सुरुवात केली.
वाचा: नेपाळमध्ये चीनची लुडबुड; पंतप्रधान ओलींच्या बचावासाठी चीनचा हस्तक्षेप
वाचा: श्रीलंकेचे भारतविरोधी पाऊल? सरकारने दिले 'हे' आदेश
दरम्यान, ३० जूनला झालेल्या कोअर कमांडर स्तरावरील बैठकीमध्ये पडताळणीची प्रक्रिया देखील ठरवण्यात आली होती. यात एक पाऊल उचलल्यानंतरच पुरावे पाहून दुसरे पाऊल उचलले जाईल असे ठरवण्यात आले होते. या पडताळणीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. शिवाय गस्ती पथक देखील प्रत्यक्षात पाहणी करेल. जेव्हा अशी पडताळणी होईल, तेव्हाच दुसरे पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती भारतीय लष्करातील अधिकाऱ्याने दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दोन्ही देशांच्या सैन्याने रिलोकेशनवर आपली सहमती दर्शवली आहे. अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी आता गलवान खोरे आता बफर झोन झाले आहे.