बीजिंग: लडाखमध्ये भारतीय जवानांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे चीन बिथरला आहे. चीनच्या हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाले असून चीनच्या बाजूनेही अधिक जीवितहानी झाली असल्याचे वृत्त आहे. भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या 'ग्लोबल टाइम्स'नेही चीनची किती जीवितहानी झाली. याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे.
चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी चीनची जीवितहानी झाली असल्याचे मान्य केले आहे. मात्र, किती चिनी जवान ठार झाले याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतरही चीनची हेकेखोरी कमी झाल्याचे दिसत नाही. ग्लोबल टाइम्सचे संपादक हु शिजीन यांनी सांगितले की, चीनच्या संयमाला कमजोरी समजू नये. चीनला भारतासोबत संघर्ष करण्याची इच्छा नाही. मात्र, आम्ही भारताला घाबरत नसल्याचेही त्यांनी सांगितले. भारतासोबत तणाव वाढल्यानंतर 'ग्लोबल टाइम्स'ने सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतली होती. त्याशिवाय विविध लेख, संपादकीयातून भारताला धमकी देण्यात येत होती.
वाचा: लडाख तणाव: खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला
वाचा: भारतीय जवानांनीच हल्ला केला; चीनच्या उलट्या बोंबा
वाचा: भारताचंही प्रत्युत्तर; चीनच्या ५ सैनिकांचा मृत्यू, ११ जखमी
दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या जीवितहानीबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. भारताने एकतर्फी कारवाई करून तणावात भर घालून सीमा प्रश्न आणखी जटील करू नये, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले. भारतीय जवानांनी चीनच्या हद्दीत घुसून चिनीवर सैन्यावर हल्ला केला असल्याचा उलटा आरोप केला आहे. मागील महिन्यापासून लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांतील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, सोमवारी दोन्ही बाजूने सैन्यांमध्ये चकमक घडली असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने पहिला हल्ला केल्यानंतर चीनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीत दोन्ही बाजूंचे जवान जखमी झाले असल्याचे चीनने म्हटले आहे.
आणखी वाचा:
भारतीय रणनितीकारांची सूचना!; चीन सरकारचा जळफळाट
चीनकडून सुरू आहे 'ही' तयारी; भारतानेही कंबर कसली
चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी चीनची जीवितहानी झाली असल्याचे मान्य केले आहे. मात्र, किती चिनी जवान ठार झाले याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतरही चीनची हेकेखोरी कमी झाल्याचे दिसत नाही. ग्लोबल टाइम्सचे संपादक हु शिजीन यांनी सांगितले की, चीनच्या संयमाला कमजोरी समजू नये. चीनला भारतासोबत संघर्ष करण्याची इच्छा नाही. मात्र, आम्ही भारताला घाबरत नसल्याचेही त्यांनी सांगितले. भारतासोबत तणाव वाढल्यानंतर 'ग्लोबल टाइम्स'ने सातत्याने भारतविरोधी भूमिका घेतली होती. त्याशिवाय विविध लेख, संपादकीयातून भारताला धमकी देण्यात येत होती.
वाचा: लडाख तणाव: खिळे असलेल्या काठ्यांनी भारतीय जवानांवर हल्ला
वाचा: भारतीय जवानांनीच हल्ला केला; चीनच्या उलट्या बोंबा
वाचा: भारताचंही प्रत्युत्तर; चीनच्या ५ सैनिकांचा मृत्यू, ११ जखमी
दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या जीवितहानीबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. भारताने एकतर्फी कारवाई करून तणावात भर घालून सीमा प्रश्न आणखी जटील करू नये, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले. भारतीय जवानांनी चीनच्या हद्दीत घुसून चिनीवर सैन्यावर हल्ला केला असल्याचा उलटा आरोप केला आहे. मागील महिन्यापासून लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चिनी सैन्याने भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांतील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, सोमवारी दोन्ही बाजूने सैन्यांमध्ये चकमक घडली असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने पहिला हल्ला केल्यानंतर चीनने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. या चकमकीत दोन्ही बाजूंचे जवान जखमी झाले असल्याचे चीनने म्हटले आहे.
आणखी वाचा:
भारतीय रणनितीकारांची सूचना!; चीन सरकारचा जळफळाट
चीनकडून सुरू आहे 'ही' तयारी; भारतानेही कंबर कसली