अ‍ॅपशहर

लडाखच्या मुद्यावर भारताच्या 'या' निर्णयावर चीनचा वर्षभराने आक्षेप!

Ladakh standoff: चीनने आता लडाखबाबत मोठे विधान केले आहे. भारताने लडाख दिलेला केंद्रशासित राज्याचा दर्जा बेकायदेशीर असून आम्ही त्याला मान्यता देत नसल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम रद्द केल्यानंतर लडाखची केंद्रशासित राज्य म्हणून स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2020, 4:23 pm
बीजिंग: एकीकडे भारतासोबत चर्चा करायची आणि दुसरीकडे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताविरोधात हजारो सैन्य आणि क्षेपणास्त्रे तैनात करणाऱ्या चीनने आता आणखी एक वक्तव्य केले आहे. भारताने लडाखला केंद्रशासित राज्याचा दर्जा दिला असला तरी चीनची त्याला मान्यता नसल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताने लडाख राज्याची स्थापना बेकायदेशीरपणे केली असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम china  on ladakh
जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर चीनने केले गंभीर वक्तव्य!


केंद्र सरकारने मागील वर्षी जम्मू-काश्मीर राज्याला दिलेला विशेष राज्याचा दर्जा काढला. त्यानंतर जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करून मागील वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी लडाख केंद्रशासित राज्याची स्थापना केली. भारताने उचललेल्या या पावलामुळे चीन भडकला असल्याची चर्चा आहे. त्यासाठी चीनने लडाख पूर्वमध्ये भारताच्या भूभागावर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबीन यांनी लडाखची स्थापना अवैधपणे केली असल्याचे म्हटले आहे. चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून कधीच मान्यता देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ वादग्रस्त असणाऱ्या भागात भारताने उभारलेल्या पायाभूत सुविधांचीही आम्ही विरोध करत असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा: मतदानापूर्वी अमेरिका क्षेपणास्त्र हल्ला करणार?; चीनची धाकधूक वाढली!

वाचा: भारताने आमचा भूभाग बळकावला; चीनमध्ये नेपाळचे फुत्कार

भारत-चीन दरम्यानच्या चर्चेबाबत त्यांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ, सीमाभागातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण होईल, असे कोणतेही पाऊल दोन्ही देश उचलणार नाहीत यावर एकमत झाले असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा भागात बांधकाम करण्यास चीनचा विरोध असल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा: अंतराळातही चीनकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न!

वाचा: पाकिस्तान गिलगिटमध्ये निवडणूक घेणार; भारताचा विरोध


भारत आणि चीनमध्ये मागील पाच महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात हिंसक संघर्ष झाल्यानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. काही आठवड्यांआधी चिनी सैन्याचे पॅन्गाँग त्सो सरोवराच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्या प्रयत्न केला. मात्र, भारतीय सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी चीनचा हा डाव हाणून पाडला. भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चिनी सैन्याला पिटाळून लावले. त्यानंतर भारतीय जवानांनी काही मोक्याच्या ठिकाणी ताबा मिळवत चिनी सैन्याला धक्का दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज