अ‍ॅपशहर

भगवान राम नेपाळी, भारतात नकली अयोध्या; नेपाळच्या PM चे वक्तव्य

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी नकाशाबदल करून आधी भारताशी सीमावाद वाढवला. आता ओली यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भगवान श्रीराम हे नेपाळचे होते, असा दावा त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2020, 10:09 am
काठमांडूः नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे सत्ता वाचवण्यासाठी सतत भारतावर आरोप करत आहेत. भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करत नकली अयोध्य निर्माण केली. पण खरी अयोध्या ही नेपाळमध्ये आहे, असा दावा ओली यांनी केला आहे. आपल्याला सत्तेवरून हटवण्यासाठी भारत कटकारस्थान रचत असल्याचा आरोप ओली यांनी या आधी केला आहे. त्या काळात आधुनिक परिवहनाचे कुठलेही साधन आणि मोबाइल फोन नव्हता. मग राम जनकपूरपर्यंत कसे गेले? असा प्रश्न ओली यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम नेपाळमध्ये खरी अयोध्या, भारतात नकली; ओलींचे वादग्रस्त वक्तव्य


नेपाळवर सांस्कृतिक स्वरुपात अत्याचार

नेपाळचे कवी भानुभक्त आचार्य यांच्या २०६व्या जयंती निमित्त पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेपाळवर सांस्कृतिक स्वरुपातून अत्याचार केला गेला. ऐतिहासिसक तथ्यांशी छेडछाड केली गेली. यामुळे भारतीय राजकुमार राम यांना सीता दिला होती असं आम्ही आताही मानतो, असं ओली यावेळी म्हणाले.

भारतातील अयोध्या नकली

भारतातील अयोध्येच्या राजकुमाराला आम्ही सीता दिला नाही. तर नेपाळमधील अयोध्येच्या राजकुमाराला राजकुमाराला दिली. बीजरंगपासून काही अंतरावर पश्चिमेला अयोध्या नावाचं गाव आहे. भारतात बनवली गेलेली अयोध्या खरी नसून ती नकली आहे, असा दावा ओली यांनी केला.

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण; धर्मांतर, निकाहसाठी जबरदस्ती

इतके दूर राम कसे येतील?

भारतायी अयोध्या खरी आहे तर मग तिथून राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसे येऊ शकतात? विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास हा नेपाळमध्ये झाला, असं ओली म्हणाले.

ऑस्ट्रेलियाचा चीनला धक्का; घेतला 'हा' मोठा निर्णय

ओली यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली

नेपाळमध्ये अनेक दिवसांपासून के. पी. ओली यांच्या राजीनाम्याची मागणी जोरधरते आहे. ओली यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केल्याने आता एक अध्यादेश आणून ते पक्षाचे विभाजन करण्याच्या प्रयत्नात आहेत. ओली हे नेपाळमधील मुख्य विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. यामुळे त्यांना पाठिंबा मिळू शकतो, असं इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तात म्हटलंय. अध्यादेश आणून ओली हे राजकीय पक्षाच्या कायद्यात बदल करू शकतात. याने त्यांना पक्षाचे सहज विभाजन करता येईल. हे सगळं चीन आणि पाकिस्तानच्या पाठिंब्याने होतंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज