अ‍ॅपशहर

india talks with taliban : भारताची तालिबानशी पहिल्यांदाच औपचारीक चर्चा, भारतीय राजदूत म्हणाले...

भारत आणि तालिबानमध्ये पहिल्यांदाच औपचारीक चर्चा झाली आहे. कतारच्या दोहामध्ये भारताचे राजदूत आणि तालिबानच्या नेत्यामध्ये चर्चा झाली आहे. यावेळी दोघांमध्ये झालेल्या बैठकीत तालिबानने भारताबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2021, 7:44 am
दोहाः अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर भारताचे तालिबानशी ( india talks with taliban ) संबंध कसे असतील? यावरून तर्कवितर्क लावले जात होते. आता ताज्या घडामोडीत कतारच्या दोहामध्ये भारतीय राजदूताने तालिबान नेत्याची भेट घेतली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्या मायदेशात परतण्याच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. यासोबतच अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग हा भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी होऊ नये, अशी भूमिका राजदुतांनी मांडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भारताची तालिबानशी पहिल्यांदाच औपचारीक भेट, भारतीय राजदूत म्हणाले...
भारताची तालिबानशी पहिल्यांदाच औपचारीक भेट, भारतीय राजदूत म्हणाले...


भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहामधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझाई यांची भेट घेतली. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या भेटीसाठ तालिबानने मागणी केली होती. दोहा येथील भारतीय दूतावासात दोन्ही प्रतिनिधींची भेट झाली. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या मायदेशात परतण्याच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अल्पसंख्यांच्या मुद्द्यावर ज्यांना भारतात यायचं आहे, यावरही चर्चा झाली. तसंच अफगाणिस्तानच्या भूमीचा उपयोग हा भारताविरोधात कुठल्याही दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ नये, हा मुद्दाही मित्तल यांनी चर्चेत उपस्थित केला. तर तालिबानच्या प्रतिनिधीने यावर आश्वासन दिलं आहे. तसंच भारताचे सर्व मुद्दे सकारात्मक मार्गाने सोडवले जातील, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

'तालिबान आझाद है', अमेरिकेचा शेवटचा सैनिक काबूलमधून बाहेर!

'भारतासोबत चांगले संबंध हवेत'

डेहराडूनच्या इंडियन मिलिल्टी अकॅडमीत (IMA) मध्ये प्रशिक्षण घेतलेला तालिबानचा वरिष्ठ नेता शेह मोहम्मद अब्बास स्टेनकझई याने मोठं वक्तव्य केलं होतं. भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, असं त्याने म्हटलं होतं. तालिबान भारतासोबत अफगाणिस्तानचे राजतैनिक, आर्थिक आणि सांस्कृतिकसंबंध कायम ठेवण्याची इच्छा आहे, असं स्टेनकझाईने म्हटलं. तालिबानच्या वरिष्ठ नेत्याकडून भारतासंबंधी पहिल्यांदाच ही प्रतिक्रिया आली होती.

तालिबानींचा क्रूरपणा उघड; लोकगीत गायकाची केली हत्या

भारत हा या क्षेत्रातील महत्त्वाचा देश आहे. यामुळे तालिबानला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. तसंच भारत आणि पाकिस्तान एकत्र बसून सर्व वादग्रस्त मुद्दे सोडवावेत. भारतानेही काश्मीरबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असं तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज