वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गुप्तचर खात्याने व्यक्त केलेल्या चिंतेमुळे शिन्हुआ या चीन सरकारच्या वृत्तसंस्थेसाठी भारतात काम करणाऱ्या तीन पत्रकारांचा भारतातील मुक्काम वाढवण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. या पत्रकारांना ३१ जुलैपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला आहे.
हे तीन पत्रकार वेगवेगळी फसवी नावे घेऊन देशातील प्रवेशावर निर्बंध असलेल्या विविध संवेदनशील ठिकाणांना भेट देत असल्याचे गुप्तचर खात्याने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. वृत्तसंस्थेचे दिल्लीतील प्रमुख वू किआंग आणि तांग लू आणि मी किआंग या दोन पत्रकारांचा व्हसिा महिना अखेरीस संपत आहे. त्यामुळे या तिघांनी आपले उत्तराधकिारी येईपर्यंत मुक्काम वाढवण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. मात्र भारत सरकारने त्यांची मागणी धुडकावून लावत मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. चीनच्या दूतावासाने आता या प्रकरणात लक्ष घातले असून परराष्ट्र मंत्रालयाला त्यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. गेल्या काही महिन्यांत भारत व चीनमधील संबंधांमध्ये राजकीय तणाव वाढला आहे. आण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाला चीनने ठाम विरोध केला होता. यामुळे या गटाचे सदस्यत्व मोठ्या राजनैतिक प्रयत्नांनंतरही भारतास मिळू शकले नव्हते. या पार्श्वभूमीवर, भारताकडून तीन चिनी पत्रकारांची झालेली हकालपट्टी ही अत्यंत संवेदनशील घटना मानली जात आहे.
गुप्तचर खात्याने व्यक्त केलेल्या चिंतेमुळे शिन्हुआ या चीन सरकारच्या वृत्तसंस्थेसाठी भारतात काम करणाऱ्या तीन पत्रकारांचा भारतातील मुक्काम वाढवण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. या पत्रकारांना ३१ जुलैपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला आहे.
हे तीन पत्रकार वेगवेगळी फसवी नावे घेऊन देशातील प्रवेशावर निर्बंध असलेल्या विविध संवेदनशील ठिकाणांना भेट देत असल्याचे गुप्तचर खात्याने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. वृत्तसंस्थेचे दिल्लीतील प्रमुख वू किआंग आणि तांग लू आणि मी किआंग या दोन पत्रकारांचा व्हसिा महिना अखेरीस संपत आहे. त्यामुळे या तिघांनी आपले उत्तराधकिारी येईपर्यंत मुक्काम वाढवण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. मात्र भारत सरकारने त्यांची मागणी धुडकावून लावत मुदत वाढवण्यास नकार दिला आहे. चीनच्या दूतावासाने आता या प्रकरणात लक्ष घातले असून परराष्ट्र मंत्रालयाला त्यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. गेल्या काही महिन्यांत भारत व चीनमधील संबंधांमध्ये राजकीय तणाव वाढला आहे. आण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वाला चीनने ठाम विरोध केला होता. यामुळे या गटाचे सदस्यत्व मोठ्या राजनैतिक प्रयत्नांनंतरही भारतास मिळू शकले नव्हते. या पार्श्वभूमीवर, भारताकडून तीन चिनी पत्रकारांची झालेली हकालपट्टी ही अत्यंत संवेदनशील घटना मानली जात आहे.